स्वातंत्र्य दिन : कागदी व प्लास्टिक राष्ट्रध्वज वापरु नका : जिल्हाधिकारी

स्वातंत्र्य दिन : कागदी व प्लास्टिक राष्ट्रध्वज वापरु नका : जिल्हाधिकारी

परभणी दि.१२  : राष्ट्रीय सणांच्या व इतर महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी नागरिक व विद्यार्थ्यांकडून प्लास्टीक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. कार्यक्रमानंतर हे राष्ट्रध्वज मैदानात व रस्त्यांवर पडलेले असतात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. हे टाळण्यासाठी कागदी व प्लास्टीक राष्ट्रध्वजाचा वापर करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.
शासनाच्या १ जानेवारी २०१५ च्या शासन निर्णयानुसार प्लास्टीक व कागदी राष्ट्रध्वज निर्मितीस पायबंद घालण्यासाठी उत्पादन, वितरण व विक्रेते यांच्या सबंधित विभागाने कार्यवाही करावी. तसेच कार्यक्रम संपल्यानंतर ठिकठिकाणी पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्याचा सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. खराब झालेले राष्ट्रध्वज पिशवी किंवा कापडामध्ये व्यवस्थित बांधून सूर्योदयापूर्वी, जिल्हाधिकारी किंवा तहसील कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीत स्वच्छ जागेत सन्मानपूर्वक नष्ट करण्यात यावेत. तसे करताना सर्वांनी उभे राहावे व ते पूर्णपणे जाळून नष्ट होईपर्यंत कोणीही जागा सोडू नये, असे निर्देशही देण्यात आले आहेत. रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करण्याकरीता जिल्ह्यातील सामाजिक संघटना, नागरी विद्यार्थी यांनी सहकार्य करावे व जमा करण्यात आलेले राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी किंवा तहसिल कार्यालयात सुपूर्द करवेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी केले आहे.


स्वातंत्र्य दिन : घराघरावर तिरंगा डौलाने फडकवावा : सीईओ विनय मून


https://sakashnews.com/?p=6840

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!