अभंगवाणी : संस्कार भारतीच्या वतीने सेलूत आज कार्यक्रम
सेलू जि.परभणी : कला आणि साहित्य क्षेत्रातील संस्कार भारती या संस्थेच्या वतीने रविवारी, २० ऑगस्ट रोजी सायंकाळी सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिर सभागृहात अभंगवाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पुणे येथील एसएनडीटी महाविद्यालयाच्या क्षितिजा कुलकर्णी, गौरी शिवपुजे, चैती सुलाखे यांचा कार्यक्रमात सहभाग आहे. अंजली सुलाखे (संवादिनी), शंतनु पाठक (तबला) यांची साथसंगत आहे. रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन, सेलू येथील संस्कार भारती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.