Kumar Saptarshi : येणारी निवडणूक सर्वांसाठी शेवटची  

Kumar Saptarshi : येणारी निवडणूक सर्वांसाठी शेवटची  

राष्ट्रीय आदर्श ग्रंथपाल जीवन गौरव पुरस्कार डॉ.शिवाजी शिंदे सन्मानित

परभणी/पुणे : भारत हा देश सर्वसमावेशक देश आहे. या देशामध्ये अनेक जाती- धर्माचे विविध पंथाचे लोक एकत्र राहतात. आज मात्र देशातील राजकारण असो किंवा समाजकारण असो, माणसामाणसात कटुता कशी निर्माण करता येईल, याचा प्रयत्न काही लोक करतांना दिसून येत आहे. येणारी निवडणूक आम्हा सर्वांची शेवटची निवडणूक असेल, असे मत डॉ.कुमार सप्तहर्षी यांनी रविवारी व्यक्त केले. भविष्यात जर एकात्मकता टिकून ठेवायची असेल तर सर्वांनी जात, पंथ,हधर्म बाजूला ठेवून एकसंघ भारत कसा राहील याची दक्षता घेणे गरजे आहे, असेही सप्तर्षी म्हणाले.

पुणे येथील अजिम कॅम्पसमध्ये प्रेस मीडिया लाईव्ह पुणे यांच्या वतीने सेलू येथील डॉ.शिवाजी शिंदे यांना राष्ट्रीय आदर्श ग्रंथापाल जीवन गौरव पुरस्काराने रविवारी सन्मानित करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

या वेळी महाराष्ट्र कॉस्मो-पॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा अजीम युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. पी.ए.इनामदार, जेष्ठ विचारवंत कुमार सप्तर्शी,आमदार मोहन जोशी,अमेदाबी इनामदार, डॉ.कुरेशी, डॉ.आरिफ मोमिन, अरविंद शिंदे, संजय मोरे, आयुब शेख आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रेस मीडिया लाईव्हचे अध्यक्ष मेहबूब सर्जेखान यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी प्रेस मीडियाच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. मराठवाड्यातील सेलू सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यामध्ये पालकांमध्ये वाचन संस्कृती वाढावी म्हणून डॉ.शिवाजी शिंदे यांनी केलेले कार्य निश्चितपणे कौतुकास्पद आहेच याची दखल घेऊन शिंदे यांना राष्ट्रीय आदर्श ग्रंथपाल जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ.पी.ए.इनामदार म्हणाले की, मी कधी ही माझ्या आयुष्यात जाती भेद पाळला नाही सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेऊन संस्थेचा विकास केला.आज माझ्या संस्थेत २७ हजार विद्यार्थी वेगवेगळ्या विभागात शिक्षण घेत आहेत. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृतीसाठी सुप्रिम कोर्टापर्यंत लढा देऊन त्यांना न्याय मिळून दिला. मुस्लिम समाजातील मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे यासाठी अहोरात्र श्रम केले. त्यात माझ्या पत्नी आमेदाबी इनामदार यांनी खांद्याला खांदा लाऊन सहकार्य केले. वाचन क्षेत्रात डॉ.शिवाजी शिंदे यांनी केलेले कार्य आजच्या युवकांना निश्चितपणे प्रेरणा देणारे आहे. त्यांनी वाचन संस्कृती वाढवी म्हणून जे काही उपक्रम राबविले आहेत ते खरोखर कौतुकास्पद आहेच. त्यातून आज विध्यार्थ्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून निश्चित शैक्षणिक धोरण आखणे गरजेचे आहे. अध्यक्षीय समारोप आमदार मोहन जोशी यांनी केला. आभार महेबूब सर्जेखान यांनी मानले.


Dysp Pranil Gilda : ध्येयपूर्तीसाठी प्रबळ आत्मविश्वासाची गरज : डीवायएसपी प्रणिल गिल्डा

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!