सामान्यांच्या जीवनात परिवर्तन करणारे सरकार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सामान्यांच्या जीवनात परिवर्तन करणारे सरकार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परभणी : ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमातून राज्याचे सरकार आपल्या सेवेत आणण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. या माध्यमातून जिल्ह्यात विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणारे ‘शासन आपल्या दारी अभियान’ आहे. ज्या ठिकाणी शेतकरी अडचणीत आहे, तिथे सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठातील क्रीडा संकुलाच्या मैदानावर रविवारी, २७ ऑगस्ट रोजी आयोजिण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या जिल्हास्तरीय विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्या वेळी मार्गदर्शन करतांना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, आमदार सुरेश वरपूडकर, बाबाजानी दुर्राणी, डॉ.रत्नाकर गुट्टे, मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार विक्रम काळे, विप्लव बाजोरिया, बालाजी कल्याणकर, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, विशेष पोलिस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रागसुधा आर., कुलगुरू डॉ.इंद्र मणी, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, सीईओ विनय मून, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, मुख्यमंत्री कार्यालयातील खाजगी सचिव डॉ.अमोल शिंदे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी खासदार सुरेश जाधव,ॲड. गणेशराव दुधगावकर, माजी आमदार माणिकराव आंबेगावकर, मोहन फड, हरिभाऊ लहाने, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, राजेश देशमुख, आनंद भरोसे, शिवसेना शिंदेगटाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव शिंदे, महानगराध्यक्ष प्रवीण देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, प्रताप देशमुख आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.
मराठवाड्याला दर चार ते पाच वर्षांनी दुष्काळाचा सामना करावा लागतो. यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना तयार केली आहे. सरकारने यासाठी केंद्र सरकारला विनंती केली असुन, यासाठी निधी मिळेल असे सांगून, पश्चिमी वाहिनी नद्यांचे वाहून जाणारे पाणी मराठवाड्याकडे वळवून पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे सांगून मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पहावा लागू नये, यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. निम्न दुधना प्रकल्पासाठी तसेच इतर प्रकल्पासाठी निधी देण्यात आला. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून देखील पाण्याचा थेंब-थेंब वाचवून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ मार्ग करण्यात येणार असून, त्यात मराठवाड्यातील पाच जिल्ह्याचे भाग्य उजळणार आहे. परभणी शहरातील रस्ते विकासासाठी तसेच रस्त्याला काँक्रिटमध्ये परिवर्तित करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे सांगून परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या बारव संवर्धन मोहीमेचे कौतुक केले. शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजना, एक रुपयात पीक विमा या महत्वाच्या योजना सुरु करण्यात आल्या आहेत. परभणी जिल्ह्यात 7 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बारा महिने वीज उपलब्ध करुन देण्याचे काम राज्य सरकार करत आहे. महिलांना बसमध्ये 50 टक्के सवलत तर ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सुविधा राज्य सरकारने उपलब्ध करुन दिली आहे, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले. संजय गांधी निराधारसारख्या विविध योजनांमध्ये मानधनात वाढ करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रकमेत देखील वाढ केली असून, गरीबांसाठी घरे बांधणीचे काम देखील मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आले आहे. शबरी, रमाई योजने अंतर्गत घर योजना व्यापक प्रमाणात राबवून बेघरांना घर उपलब्ध करुन देण्याचे काम राज्य सरकार करत आहे. ओबीसी प्रवर्गासाठी मोदी आवास योजना सुरू केली आहे. या योजनेतून जेवढी घरे मागाल तेवढी घरे देण्याचे काम शासन करणार आहे. परभणी वैद्यकीय महाविद्यालयाबाबत केंद्र शासनाने गतीने निर्णय घेतला. राज्य सरकारने राज्यात एका वर्षात 10 वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे श्री.फडणवीस यांनी सांगितले.


CM Eknath Shinde : सर्वसामान्यांच्या हितालाच सर्वोच्च प्राधान्य : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!