हरेगाव प्रकरणातील दोषींवर तात्काळ कारवाईची सेलूमध्ये मागणी; कबूतर चोरल्याच्या कारणावरून बेदम मारहाणीची घटना
सेलू जि.परभणी : हरेगाव प्रकरणातील दोषींवर तात्काळ कठोर करावी यासाठी क्रांती फाऊंडेशन, सेलू तर्फे तहसीलदार यांना बुधवारी, ३० ऑगस्टरोजी निवेदन सादर करण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव मधील शूभम मघाडे या बौद्ध समाजाच्या तरुणास गावगुंडानी केलेले अमानुष अत्याचार, मारहाण, थुंकी चाटायला लावली. लघवी अंगावर केली. कारण काय तर त्याने शेतातील कबूतर चोरीस नेल्याचे सांगितले आहे. जातीयवादी लोकांनी जातीय भावनेने तरुणाच्या तोंडावर लघवी करून त्याचा व्हीडीओ बनवून सोशल मिडीयावर टाकण्यात आला आहे. या सर्व प्रकारावरुन समाजात आजही कोणत्या प्रकारची जातीयवादी मानसिकता आहे व कोणत्या ना कोणत्या मार्गाने मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचार चालू ओत. सद्यस्थितीत भारत देश हा चंद्रावर अस्तित्व निर्माण करून जगाला विश्वगुरू असल्याचा संदेश देत आहे. आणि पुरोगामी महाराष्ट्रात मात्र मागासवर्गीयांवर जनावरांसारखा अन्याय केला जात आहे. सदरील घटनेचा क्रांती फाउंडेशन, सेलूच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. सदर घटनेची तात्काळ चौकशी करुन दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा; लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. निवेदनावर क्रांती फाउंडेशनच्या अध्यक्षा पोर्णिमा जोहिरे तसेच मानसी कोल्हे, स्नेहल कनकुटे, सरोज पाटोळे, आम्रपाली खंदारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.