छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी शेतकऱ्यांचे सत्याग्रह धरणे आंदोलन

छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी शेतकऱ्यांचे सत्याग्रह धरणे आंदोलन

भाकप, किसान सभा, लालबावटा शेतमजूर युनियन आदी संघटना करणार नेतृत्व 

परभणी : संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा, मराठवाड्याला २० हजार कोटीचे विशेष पॅकेज द्या, सर्व महसूल मंडळात सोयाबीनसह खरीप पिकांना २५% अग्रिम पीकविमा भरपाई तत्काळ विमा कंपन्यातर्फे द्या, शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने बळकावणारा जालना-परभणी-नांदेड समृद्धीमार्ग रद्द करा आदींसह विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील मंत्रिमंडळ बैठकीवर शनिवारी, १६ सप्टेंबर रोजी सत्याग्रह व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र राज्य किसान सभा, लालबावटा शेतमजूर युनियन व आयटक संघटनेच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत हे आंदोलन करण्यात येणार आहे. किसान सभेचे सरचिटणीस कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी ही माहिती दिली. आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यानी सकाळी ११ वाजता पैठणगेट येथे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

थकीत पीकविमा देण्यास नकार देणाऱ्या पीकविमा कंपन्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, जलसंपत्ती प्राधिकरण कायदा यातील १२(६) क च्यातरतुदीनुसार वरच्या धरणातून जायकवाडीत २० टीएमसी पाणी द्या, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात रेशन पुरवठा पूर्ववत करा रेशन रोखीकरणाचा २८ फेब्रुवारी २३ चा आदेश रद्द करा, विनाअनुदानित व शासकीय सर्व अभ्यासक्रमातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करा, ४० हजार एकर जमीन कोरडवाहू करणारा व शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने बळकावणारा जालना-परभणी-नांदेड समृद्धीमार्ग रद्द करा. भूसंपादन व पुनर्वसन कायदा २०१३ ची अंमलबजावणी करा. सर्व गायरान व फॉरेस्ट जमिनी कसणाऱ्या व घरे करणाऱ्या दलित आणि श्रमिकांच्या नावे करा. अतिक्रमणविरोधी नोटीस रद्द करा. घरकुल योजनांचा लाभ द्या, मराठवाड्याच्या सिंचन प्रकल्पासाठीचा अडवलेला निधी अदा करा, जायकवाडी कालवे दुरुस्तीचा ७५० कोटी निधी तात्काळ उपलब्ध करा. येलदरी व सिद्धेश्वर प्रकल्प यांच्या दुरुस्तीसाठी ७६९ कोटी रुपये निधी उपलब्ध करा, रोहयोतून रुपये ८००० कोटीची सार्वजनिक कामे सुरु करा. ग्रामपंचायतीचा अधिकार कायद्याने कायम करा, मराठवाड्यातील ऊसतोडणी कामगारांवर लावण्यात आलेल्या खोट्या केसेस रद्द करा, ऊसतोडणी महामंडळातर्फे नोंदणी करून प्रा फंड विमा अपघात नुकसान भरपाई आणि वित्तसहाय्य करा, आत्महत्याग्रस्त शेतकरी शेतमजूर कुटुंबांना मदतीत २० लाख रुपयांची मोफत मदत द्या, गोदावरी दुधना सहकारी साखर कारखाना व अन्य विक्री केलेल्या कारखान्यातील कामगार शेतकऱ्यांची थकीत देणी अदा करा, ईपीएफ मधील पेन्शनर्सचे प्रश्न सोडवा. प्रलंबित पेन्शन तत्काळ सुरु करा आदी मागण्यांसाठी मंजूर करण्यात याव्यात यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. कॉम्रेड राजन क्षीरसागर, माधुरी क्षीरसागर, शेख अब्दुल, ज्ञानेश्वर काळे, संदीप सोळुंके, ओंकार पवार, आसाराम बुधवंत, शिवाजी कदम, लक्ष्मण काळे, चंद्रकांत जाधव, प्रसाद गोरे, मुंजाभाऊ लिपणे, नवनाथ कोल्हे, अंगद भोरे, अरुण हरकळ, अनिल पंडित, सय्यद अझहर, मितेश सुक्रे, अप्पा कुराडे, शेख अनिस, श्रीनिवास वाकणकर, शेख सरवर, मुरली पायघन, शंकर पालकर, दयानंद यादव, आसाराम जाधव, लक्ष्मण घोगरे, सम्बद इब्राहीम, मुगाजी बुरुड, वैजनाथ भोरे, शेळके संजय, महादेव चाफे आदींच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे.


सेलूतील अपूर्वा पॉलिटेक्निकमध्ये अभियंता दिन उत्साहात

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!