निम्न दुधना धरणातून रब्बीसाठी पाणी सोडा

निम्न दुधना धरणातून रब्बीसाठी पाणी सोडा

सेलू तालुका दबाव गटाची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

रब्बी पेर होण्यासाठी जनावरांचा चारा, पाणीप्रश्न सुटण्यासाठी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यात तात्काळ पाणी सोडण्यात येणे अत्यंत गरजेचे व जरूरीचे आहे. या प्रश्नात तात्काळ लक्ष घालून संबंधित विभागास पाणी सोडण्याबाबतचे आदेशित करावी. तसेच मोरगाव येथील नदी पात्रातील बांधाऱ्याचे दरवाजे बंद करण्याबाबत आदेश देण्यात यावेत, असे निवेदनात नमूद केले आहे.

सेलू जि.परभणी : निम्न दुधना धरणातून शेतीसाठी डाव्या व उजव्या कालव्यात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी दबाव गटाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आले आली आहे. उपजिल्हाधिकारी सेलू यांच्यामार्फत बुधवारी निवेदन देण्यात आले.
यावर्षी जून ते सप्टेंबर या काळात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. खरिपाची पिके हातची गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. सोयाबीन पीक पावसाने ऐन मोसमात ताण दिलेल्याने निम्मेही उत्पादन होणार की नाही, हा प्रश्न आहे. त्यामुळे पीकविमा कंपनीने सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश देणे आवश्यक आहे. यातच आता परतीच्या पावसाने दडी मारल्याने रब्बी पेरणी होईल की नाही? याबाबत शंकाच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या शेतात उभ्या असलेल्या कापूस, तूर इत्यादी पिकांना सध्या पाण्याची नितांत आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे भविष्यात पुढील हंगामापर्यंत जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर होण्याचा धोका आहे. त्यासाठी रब्बी पेर होण्यासाठी जनावरांचा चारा, पाणीप्रश्न सुटण्यासाठी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यात तात्काळ पाणी सोडण्यात येणे अत्यंत गरजेचे व जरूरीचे आहे. या प्रश्नात तात्काळ लक्ष घालून संबंधित विभागास पाणी सोडण्याबाबतचे आदेशित करावी. तसेच मोरगाव येथील नदी पात्रातील बांधाऱ्याचे दरवाजे बंद करण्याबाबत आदेश देण्यात यावेत, असे निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर ॲड. श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाळ, ॲड. चव्हाण, गुलाब पौळ, मुकुंद टेकाळे, रामचंद्र कांबळे, लक्ष्मण प्रधान, अब्दुल रौफ, दत्तराव कांगणे, भारत रवंदळे, नारायण पवार, दत्ता गायके, परमेश्वर कादे, दिलीप मगर, उत्तम गवारे, राजेंद्र केवारे, अजित मंडलीक, ॲड. देवराव दळवी, ॲड. योगेश कुलकर्णी, उमेश काष्टे, लिंबाजी कलाल, विलास रोडगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


निर्भय बनो : दडपशाही विरोधातील लढाईसाठी सज्ज राहा : डॉ.विश्वंभर चौधरी यांचे आवाहन

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!