स्वामी रामानंद तीर्थ ग्रंथालयाच्या स्पर्धांना प्रतिसाद; मान्यवरांच्या उपस्थितीत सेलूत पारितोषिक वितरण
डॉ.अनुपमा जवळेकर म्हणाल्या, की मोबाईल पासून दूर राहून वाचन संस्कृती जोपासण्याची आज नितांत गरज आहे. ज्ञान वाढवण्यासाठी वाचन सर्वसमावेशक असावे. वाचनातून एक नवी दृष्टी मिळते. बुके ऐवजी बुक्स भेट द्या. रामराव गायकवाड म्हणाले, ” वाचन भरपूर करा, महापुरुषांच्या विचारांचे आचारण कृतीमध्ये आणण्यासाठी जिद्द, चिकाटी, सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे.”
सेलू : भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम जयंती व वाचन प्रेरणा दिनानिमित्त सेलू् येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वतीने आयोजित वाचन सप्ताह उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम व सांस्कृतिक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेतील विजेत्यांना शुक्रवारी,२० ऑक्टोबररोजी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात प्रमाणपत्र व पारितोषिकांनी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे उपाध्यक्ष एम.आर.पटेल होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अनुपमा जवळेकर, श्री के.बा.विद्यालयाचे सचिव महेश खारकर, रामराव गायकवाड, सहसचिव चंद्रशेखर मुळावेकर यांची उपस्थिती होती. डॉ.जवळेकर म्हणाल्या, की मोबाईल पासून दूर राहून वाचन संस्कृती जोपासण्याची आज नितांत गरज आहे. ज्ञान वाढवण्यासाठी वाचन सर्वसमावेशक असावे. वाचनातून एक नवी दृष्टी मिळते. बुके ऐवजी बुक्स भेट द्या. रामराव गायकवाड म्हणाले, वाचन भरपूर करा, महापुरुषांच्या विचारांचे आचारण कृतीमध्ये आणण्यासाठी जिद्द, चिकाटी, सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सामान्यज्ञान, वक्तृत्व, सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांचा तसेच कविसंमेलनात सहभागी बालकवींचा गौरव करण्यात आला तसेच पुरस्कारप्राप्त ग्रंथपाल महादेव आगजाळ, शिक्षक योगेश ढवारे, शरद ठाकर तसेच डॉ.जयश्री सोन्नेकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ.गंगाधर गळगे, सर्जेराव लहाने, माधव गव्हाणे, विजय ढाकणे, गौतम सूर्यवंशी, गंगाधर कान्हेकर, डॉ.राजेंद्र मुळावेकर आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक चंद्रशेखर मुळावेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.अनंत मोगल यांनी केले. वाचन सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल महादेव आगजाळ, पंडितराव जगाडे, विलास शिंदे, अनिरुद्ध टाके, अमोल बिडवे, काशीनाथ पल्लेवाड, कीर्ती राऊत, सुभाष मोहकरे, बाबासाहेब हेलसकर, भाग्यश्री धामणगावकर, कीर्ती अंबेकर, सुरेश हिवाळे, योगेश ढवारे, सुयोग साळवे, धनश्री देशमुख आदींनी परिश्रम घेतले.