Diwali Pahat : जिंतूरमध्ये रंगली स्वरमयी दिवाळी; आमदार मेघना बोर्डीकरांच्या गायनालाही उत्स्फूर्त दाद
येत्या २२ जानेवारीरोजी आयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्ताने प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरी गुढी उभारून या सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी या वेळी केले.
परभणी : जिंतूर येथे बोर्डीकर परिवाराच्या वतीने सोमवारी नरेंद्र राठोड प्रस्तुत ” स्वरमयी दिवाळी पहाट” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गायकांनी सादर केलेल्या विविध भावगीते आणि भक्तीगीतांनी जिंतूरकरांना मंत्रमुग्ध केले. दरम्यान, याप्रसंगी आमदार मेघना बोर्डीकर आणि भावना बोर्डीकर यांनी गायलेल्या गाण्यांनाही श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, मीनाताई बोर्डीकर, गंगाधर बोर्डीकर, भावना बोर्डीकर, नयना दाते, डॉ.सदानंद दाते, सचिन मुंगसे, श्रीपाद अंबड, माजी नगराध्यक्ष सचिन गोरे, महेश चैतन्य महाराज, संदीप शर्मा महाराज, बंडू देव महाराज, वैजनाथ महाराज गरड, विनायक टाक महाराज, अनंता सांगळे महाराज, राजू बुवा दाभेकर, मृदंगाचार्य रामकृष्ण महाराज दराडे, श्याम महाराज दगड, सुनील भोम्बे, डॉ.पंडित दराडे, लक्ष्मण बुधवंत, तालुकाध्यक्ष विनोद राठोड, ॲड.मनोज सारडा आदी मान्यवरांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी या वेळी उपस्थितांशी संवाद साधला. जनतेने बोर्डीकर कुटुंबावर मागील ३५ वर्षापासून नितांत प्रेम केले आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच अशा स्नेहमिलनाचा कार्यक्रम कुटुंबासह प्रत्यक्ष अनुभवता येत असल्याचे आवर्जून सांगितले. येत्या २२ जानेवारीरोजी आयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्ताने प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरी गुढी उभारून या सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन बोर्डीकर यांनी या वेळी केले. अत्यंत कमी पाऊस झाल्याने मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट आहे, असे नमूद करून आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी देशात आणि राज्यामध्ये आपले सरकार असल्यानेच गोरगरीब सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर न सोडता पिक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. याप्रसंगी मतदार संघातील नीट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी, उपस्थित महाराज, पंचपदी मंडळ, श्रीरामकृष्ण हरी प्रभात फेरी मंडळ, श्री स्वामी समर्थ केंद्र, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे भक्तगण यांचा सन्मान येथे करण्यात आला. वसंतराव शिंदे, ब्रिजगोपाल तोष्णीवाल, राजू देवकर, संतोष देशमुख, सखाराम चिद्रवार, किरण वट्टमवार, कैलास खंदारे, भगवान वाटाणे, दत्ता कटारे, सुधीर शहाणे, प्रदीप राठी, प्रदीप चौधरी, सुनील तोष्णीवाल, गजानन काळे, सुनील मते, गोपाळ रोकडे, अशोक बुधवंत, बंडू पल्लेवार, गजानन दरगड, गणेश कुरे, डॉ.दुर्गादास कानडकर, डॉ.गणपत वाघमारे, डॉ.देवराव कराळे, डॉ.संतोष घुगे, गजानन वऱ्हाड, सत्यनारायण शर्मा, रमन तोष्णीवाल, गोविंद दायमा, डॉ.सविता वाघमारे, डॉ.गीतांजली कानडकर, शुभांगी गोरे, धनश्री बोर्डीकर, रंजना भोम्बे, शिवकन्या रोकडे, अंजली कदम, मीरा कराळे, श्वेता कोठारी, मोना शर्मा, पद्मा तोष्णीवाल, पूनम सारडा, डॉ.सुरेखा घुगे यांच्यासह प्रतिष्ठित व्यापारी आणि महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
अत्यंत कमी पाऊस झाल्याने मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट आहे, असे नमूद करून आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी, देशात आणि राज्यामध्ये आपले सरकार असल्यानेच गोरगरीब सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर न सोडता पिक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा होत असल्याचे निदर्शनास आणून दिले.