जनमत महाविकास आघाडीकडेच : माजी आमदार विजय भांबळे
पावडे हादगाव शिवारात दीपावली स्नेहमेळावा उत्साहात
सेलू जि.परभणी : राज्यातील सरकारच्या धोरणामुळे सामाजिक अस्वस्थता, व्देष व तेढ निर्माण झाली आहे. सर्वच आघाड्यावर सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे जनतेत सरकारविषयी प्रचंड असंतोष असून, जनमत महाविकास आघाडीच्या बाजुनेच आहे. सर्वांनी एकजुटीने, एकदिलाने कामे करावीत. आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे यांनी केले.
सेलू (जि.परभणी) तालुक्यातील पावडे हादगाव शिवारात शनिवारी, १८ नोव्हेंबररोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) वतीने दीपावली पाडव्यानिमित्त स्नेहमेळावा आयोजिण्यात आला होता. अध्यक्षीय भाषणात भांबळे यांनी संवाद साधला. कॉंग्रेस तालुकाध्यक्ष हेमंतराव आडळकर, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष प्रेक्षा भांबळे, सारंगधर महाराज, बाजार समिती सभापती चक्रधर पौळ, प्रकाशराव मुळे, शिवसेनेचे रामनाना पाटील, रणजित गजमल, माजी सभापती अशोक काकडे, रामराव उबाळे, पुरुषोत्तम पावडे, विनायक पावडे, सुधाकर रोकडे, अप्पासाहेब डख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
भांबळे म्हणाले की, मराठा आरक्षण, दुष्काळ सदृश्य परिस्थिती, शेतकरी आणि जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न, विकासकामांना बाजूला ठेवून विद्यमान सरकारच्या धोरणांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाल्या आहेत. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले. गोरख भालेराव, माऊली राऊत, सुरेंद्र तोष्णीवाल, अनिल बरडे, उदय रोडगे, निर्मला लिपणे, शिवराम कदम, विशाल देशमुख, रमेश डख, शेख दिलावर, संभाजी पवार, छगन शेरे, सचिन शिंदे, अजीम कादरी, मजीद बागवान, पप्पू शिंदे, नाना बोबडे, परवेज सौदागर, इरफान लाला, तोफिक भाई, ॲड.विष्णू ढोले, महेमूदसर, कल्याण जोगदंड आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.