Yuva Sangharsh Padyatra : सत्ताधाऱ्यांकडूनच ‘ओबीसी विरूद्ध मराठा’ वाद वाढविण्याचा प्रयत्न : आमदार रोहित पवार
पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांचे मत : जिंतूरमध्ये युवा संघर्ष पदयात्रेचे जोरदार स्वागत
सध्या राज्यात भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारी मंडळींकडून धर्म आणि जातीय वाद मोठ्या प्रमाणावर वाढविला जात आहे. याद्वारे महाराष्ट्रातील समता, एकता, बंधुतेचा विचार तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिंदू- मुस्लिम ऐवजी आता ओबीसी विरूद्ध मराठा असा वाद लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असा आरोप पवार यांनी केला. भाजपाचा पूर्वीपासूनच आरक्षणला विरोध आहे, असे सांगून मंत्री छगन भुजबळ संवैधानिक पदावर असतांना समतेऐवजी आता भाजपाची समरसतेची भाषा बोलत आहेत. अशी टीका आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.
परभणी : कर्नाटकामध्ये हिंदू-मुस्लिम फार्म्युला जमला नाही. म्हणून आता भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रात ओबीसी विरूद्ध मराठा वादा वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, परंतु जनतेला चांगले लक्षात आले की यात हित कोँणाचे आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. मालेगाव येथे रविवारी,26 नोव्हेंबररोजी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार पवार बोलत होते. या वेळी माजी आमदार विजय भांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते
आमदार पवार म्हणाले की, आरक्षण, राज्याबाहेर पळविलेले उद्योग, जातीनिहाय जनगणना, अडीच लाख पदभरती, शेतकरी, कष्टकरी, व्यावसायिक, व्यापारी तरूण, तरुणी, बेरोजगार, महिला सुरक्षितता, आदी ३५ मुद्द्यांवर युवा संघर्ष पदयात्रा सुरू आहे. याद्वारे तरुणांसह सर्व सामान्य जनतेचा आवाज नागपूर हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत. राज्यातील विविध घडामोडींवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना आमदार पवार यांनी उत्तरे दिले. आपली भूमिका स्पष्ट केली. सध्या राज्यात भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारी मंडळींकडून धर्म आणि जातीय वाद मोठ्या प्रमाणावर वाढविला जात आहे. याद्वारे महाराष्ट्रातील समता, एकता, बंधुतेचा विचार तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिंदू- मुस्लिम ऐवजी आता ओबीसी विरूद्ध मराठा असा वाद लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असा आरोप पवार यांनी केला. भाजपाचा पूर्वीपासूनच आरक्षणला विरोध आहे, असे सांगून मंत्री छगन भुजबळ संवैधानिक पदावर असतांना समतेऐवजी आता भाजपाची समरसतेची भाषा बोलत आहेत. अशी टीका पवार यांनी केली.
दरम्यान, शनिवारी रात्री आठच्या सुमारास आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील युवा संघर्ष पदयात्रा परभणी जिल्ह्यातील देवगावफाटा येथे दाखल झाली. या वेळी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. चारठाणा येथे पदयात्रेचे जंगी स्वागत झाले. रविवारी सायंकाळी जिंतूर शहरात पदयात्रेवर जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी उधळून जोरदार स्वागत करण्यात आले. राज्यसभा सदस्य डॉ.फौजिया खान, माजी आमदार विजय भांबळे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहुल पाटील, आमदार संदीप क्षीरसागर, प्रेक्षा भांबळे, अजय गव्हाणे, अशोक काकडे आदींसह महाविकास आघाडी घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.