शेतमालाचे भाव कोसळण्यास सरकारच जबाबदार : रघुनाथदादा पाटील
सेलूमध्ये शेतकरी संघटनेची कार्यकारिणी बैठक, शेतकरी मेळावा उत्साहात
रघुनाथदादा पाटील म्हणाले, ” मागील दहा वर्षात मोदी सरकारकडून सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका घेतली जात आहे. खाद्यतेलाची सुमारे १६५ कोटी टन आयात केली आहे. त्यामुळे कापूस, सोयाबीन, भूईमूग आदी शेतीमालाचे भाव कमालीचे कोसळले आहेत. दुधाची भेसळ रोखण्यात केंद्र आणि राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. इथेनॉल निर्मितीला बंदी घातल्याने उसाचे उत्पादन आणि भाव पडणार आहेत. यामुळे आगामी लोकसभेत शेतकऱ्यांचे सरकार आणण्यासाठी शेतकरी संघटना भारत राष्ट्र समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.”
सेलू जि.परभणी : मोदी सरकारने इथेनॉल निर्मिती बंदीसह साखर, कांद्यावर निर्यात बंदी केली. दाळी, खाद्यतेलाची बेसुमार आयात केली आहे. केंद्र सरकारच्या या शेतकरीविरोधी भूमिकेमुळे सर्वच शेतीमालाचे भाव कोसळले आहेत. सरकारच याला जबाबदार आहे, असे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केले.
सेलू (जि.परभणी) येथे मंगळवारी, १२ डिसेंबर रोजी आयोजित संघटनेच्या कार्यकारिणी बैठक व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कार्याध्यक्ष कालिदास आपेट, सुरेंद्र अंबुलगे, शिवाजीराव नांदखिले, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे, रमेश माने, दत्ता कदम, बंडू सोळंके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
रघुनाथदादा पाटील म्हणाले, मागील दहा वर्षात मोदी सरकारकडून सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका घेतली जात आहे. खाद्यतेलाची सुमारे १६५ कोटी टन आयात केली आहे. त्यामुळे कापूस, सोयाबीन, भूईमूग आदी शेतीमालाचे भाव कमालीचे कोसळले आहेत. दुधाची भेसळ रोखण्यात केंद्र आणि राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. इथेनॉल निर्मितीला बंदी घातल्याने उसाचे उत्पादन आणि भाव पडणार आहेत. यामुळे आगामी लोकसभेत शेतकऱ्यांचे सरकार आणण्यासाठी शेतकरी संघटना भारत राष्ट्र समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.”
दरम्यान, या वेळी आंबेठाण येथे शरद जोशी यांचे वैचारिक स्मारक उभारले जाणार असल्याचा निर्धार करण्यात आला. तर शरद जोशींच्या विचारांना छेद देणार्या पाळीव शेतकरी संघटनांचा, सौर ऊर्जेची शेती करण्यावर तसेच इथेनॉल निर्मिती बंदीचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. प्रारंभी हुतात्मा बाबू गेनू आणि शरद जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अमृतराव शिंदे, तर सूत्रसंचालन भागवत बोबडे यांनी केले. आनंद भालेकर, ॲड.माणिक शिंदे, सुभाष मोरे, हनुमंत वीर, रामेश्वर गाडे आदींंसह कार्यकारिणी सदस्य, अशोक उफाडे, गणेश काष्टे, बळीराजा संघर्ष समितीचे सदस्य व शेतकऱ्यांची उपस्थिती होती