मुख्यमंत्री-माझी शाळा, सुंदर शाळा : कृषीभूषण संजय नाईकवाडे यांनी दिले व्यावसायिक शिक्षणाचे धडे; सेलूतील ज्ञानतीर्थ विद्यालयामध्ये व्याख्यान

मुख्यमंत्री-माझी शाळा, सुंदर शाळा : कृषीभूषण संजय नाईकवाडे यांनी दिले व्यावसायिक शिक्षणाचे धडे; सेलूतील ज्ञानतीर्थ विद्यालयामध्ये व्याख्यान

सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित ज्ञानतीर्थ विद्यालय सेलू येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत स्वयंरोजगार, व्यवसाय, व्यापार, उद्योग अशा क्षेत्रात भविष्यात करीअर घडविण्यासाठी विशिष्ट कौशल्यावर आधारित व्यवसाय शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी व्यावसायिक शिक्षण मार्गदर्शनपर व्याख्यान (ता.13) वार शनिवार रोजी शाळेच्या क्रीडांगणावर पार पडली.
या कार्यक्रम प्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून सेलू तालुक्यातील देऊळगाव येथील कृषी भूषण पुरस्कारप्राप्त संजय नाईकवाडे, मुख्याध्यापिका शालिनी शेळके, मुख्याध्यापक हरिभाऊ कांबळे,  इंद्रजीत मोरे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
रेशीम उत्पादन हा शेतीस पूरक व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुट पालन व्यवसाय याप्रमाणे हा व्यवसाय, अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो. नवीन तुती लागवड पद्धत व नवीन किक संगोपन पद्धत यामुळे हा व्यवसाय कमी मजूरात मोठया प्रमाणात करता येतो. तुती लागवड, निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीत करता येते. या पट्टा पद्धतीने लागवड केल्याने तुती लागवडीपासून पाल्याच्या उत्पन्नात वाढ होते. पट्टा पद्धतीस अत्यंत कमी पाणी लागते. एक एकर ऊस लागणाऱ्या पाण्यात ३ एकर तुती जोपासता येते.तुतीची लागवड एकदा केल्यानंतर १५ वर्षेपर्यंत जिवंत राहत असल्याने, दरवर्षी लागवड करावी लागत नाही. त्यामुळे लागवडीचा खर्च इतर पिकां प्रमाणे वारंवार येत नाही. आठमाही पाण्याची सोय असलेल्या शेतकयांस देखील हा व्यवसाय करता येतो.
पट्टा पद्धतीने लागवड केल्याने तुती शेतीत इतर आंतरपिके घेऊन उत्पन्नात भर घालता येते. तुती बागेस रोग व किटक यांचा प्रार्दुभाव होत नसल्याने औषधोपचाराचा खर्च वाचतो. शेतकऱ्यांस अवघ्या १४ दिवसांत कोश उत्पादनाचे पीक घेता येईल. यामुळे शेतकयांचा वेळ, श्रम, व पैसा वाचेल व तसेच एकूण उत्पादनात २५ टक्के पर्यंत वाढ होईल. शेतीमध्ये रेशीम कोशा शिवाय अवघ्या १४ दिवसांत उत्पन्न देणारे आज एकही नगदी पीक नाही. सुशिक्षीत बेरोजगारांना नोकऱ्यां शिवाय यात दरमहा उत्पन्न मिळविता येते. इतर शेती पिकां प्रमाणे यात पूर्ण व मोठया प्रमाणात नुकसान होत नाही. शेतकऱ्यांच्या कोश खरेदीची हमी शासनाने घेतलेली असून त्यांच्या सोयीसाठी आवश्यक त्या ठिकणी कोश खरेदी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सदर कोश खरेदी ही शास्त्रीय पद्धतीने होत असून त्याचा दर रु. ४५०/- रु प्रती किलो आहे.
रेशीम उद्योग हा कृषी व वन संपत्तीवर आधारीत उद्योग असुन यामध्ये रोजगाराची मोठी क्षमता आहे. कृषी विकास दरवृद्धी बरोबरच ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावण्यास मदत करणारा हा उद्योग आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून रेशीम उद्योगास प्रोत्साहन देण्यात येत असूनही राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात या उद्योगाकडे वळलेले दिसून येत नाहीत. हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतकर्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने रेशीम उद्योगाचा प्रचार व प्रसार करणेसाठी या घटकाचा समावेश नानाजी देशमुख कृषी सांजीवनी प्रकल्पांतर्गत करण्यात आलेला आहे.
रेशीम अळयांची विष्ठा दुभत्या जनावरांना सुग्रास प्रमाणे खाद्य म्हणून वापरता येते. यातून १ ते दीड लिटर दूध वाढते, वाळलेला पाला व विष्ठेचा गोबरगॅस मध्ये उपयोग करून उत्तम प्रकारे गॅस मिळतो, संगोपनाक वापरलेल्या चोथा करून त्यावर अळींबीची लागवड करता येते व त्यानंतर चोथ्यापासून गांडूळ खत करता येते. रेशीम उद्योगापासून देशाला परकीय चलन मिळते व देशाच्या विकासात हातभार लागतो, तुतीची दरवर्षी तळ छाटणी करावी लागते .या छाटणी पासून मिळणारी तुती कोश खाजगी व शासनामार्फत खरेदी केली जातात. विदेशात तुतीच्या पानांचा चहा करतात, कोश मेलेल्या प्युपाचा आयुर्वेदिक औषधे व सौंदर्य प्रसाधनात उपयोग करता येतो, एका तुतीच्या झाडापासून सुमारे १५ वर्षे उत्पन्न मिळत राहते. आदी फायदे रेशीम उत्पादनातून होतात. असे बोलताना संजय नाईकवाडे म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या शिलार यांनी केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!