विभागीय कथाकथन स्पर्धेत अमृता, प्रतीक्षा, अक्षरा, आरती विजेत्या; हेलस साने गुरुजी कथामाला व मानस फाऊंडेशनचा उपक्रम
मानस फाऊंडेशनचे डाॅ.प्रकाश आंबेकर म्हणाले, की आत्मबोध आणि संस्कारासाठी कथांचे अभिवाचन गरजेचे आहे. मुलांनी मोबाईल विश्वात रमण्यापेक्षा थेट पुस्तकाचे वाचन करावे. कथा मनावर थेट संस्काराचे सिंचन करते.
सेलू जि.परभणी : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलस आणि मानस फाऊंडेशन, जालना आयोजित मराठवाडा विभागीय कथाकथन स्पर्धेची अंतिम फेरी शुक्रवारी (१९ जानेवारी) सेलू येथील यशवंत विद्यालयात पार पडली. बालगटातून जालना येथील अहिल्यादेवी प्राथमिक विद्यालयाच्या अमृता अनिल कांबळे, तर किशोरगटातून सेलू येथील नूतन कन्या प्रशालेच्या प्रतीक्षा छत्रगुण मोगल हीने प्रथम पारितोषिक मिळविले.
पूज्य साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त आयोजित या स्पर्धेच्या जिल्हा फेरीत मराठवाड्यातील ३८२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. अंतिम फेरीत १६ स्पर्धक दाखल झाले होते. उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्रा.बसवराज कोरे होते. अध्यक्षस्थानी यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मुकेशराव बोराडे होते. मुख्याध्यापक रामप्रसाद गोरे, रतन थटवले यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी साने गुरुजी कथामाला संस्काराचे वारकरी महोत्सव समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा.बसवराज कोरे म्हणाले, की शिक्षकांनी विद्यार्थ्यात सेवा,शिस्त आणि श्रमदान यातून श्रमसंस्काराचे धडे दिले पाहिजे. सद्य परिस्थिती पाहता जीवनाला आकार देणारे मूल्यसंस्काराचे विचार स्वीकारले पाहिजे, असे नमूद करून कथामालेच्या कार्यासाठी ११ हजार रुपये निधी जाहीर केला. मुख्याध्यापक रामप्रसाद गोरे यांनी मनोगतातून हेलस साने गुरूजी कथामालेच्या कार्याच्या गौरव करीत विभागीय स्पर्धा आयोजनाची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी यशवंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पूज्य साने गुरूजींच्या कार्यावर आधारित तयार केलेल्या भितीपत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
विजेत्यांना संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, प्रा.बसवराज कोरे, मानस फाऊंडेशनचे प्रमुख डाॅ.प्रकाश आंबेकर, प्रा.प्रकाश कुरुंदकर यांच्या हस्ते रोख पारितोषिक, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व श्यामची आई ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात आले. या वेळी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी साने गुरूजी कथामालेच्या माध्यमातून कल्पना हेलसकर आणि त्यांच्या टीमने उपक्रमात सातत्य ठेवल्याचे नमूद केले. संयोजिका कल्पना हेलसकर, डाॅ.सुहास सदाव्रते, डाॅ.यशवंत सोनुने, प्रा. प्रकाश कुरुंदकर, बाबासाहेब हेलसकर, विजय वायाळ, संतोष लिंगायत, नंदकुमार काळे, सतीश कुलकर्णी, विलास शिंदे, अनिता शिंदे, कीर्ती राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. परीक्षक म्हणून डाॅ.जयश्री सोन्नेकर, महादेव आगजाळ, भगवान पावडे यांनी काम पाहिले. अनुराधा कानडे यांनी खरा तो एकचि धर्म प्रार्थना गायली. प्रास्ताविक कल्पना दत्तात्रय हेलसकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रमोद देशमुख यांनी केले. विजय वायाळ यांनी आभार मानले. प्रा.यादव गायकवाड, रवि मुळावेकर, प्रा.नागेश कान्हेकर, रामप्रसाद गोरे, रतन थटवले, छाया कोतवाल, सविता कुलकर्णी, शशीकांत सराफ, अनुराधा कानडे, विष्णू वामन, कैलास राऊत, भाऊराव सूर्यवंशी, अमर बोराडे, काशिनाथ काळे, महादेव सांगुळे, जयश्री चपाटे, आश्विनकुमार केदासे आदींसह विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. संतोष खुडे, सिध्देश्वर मुरकुटे, कैलास खरड, गंगाधर पाचपुते, दीपक गजभारे, धनश्री रेवलकर, बालासाहेब मगर, कविता सिसोदे, स्वप्निल ब्रह्मराक्षे आदींंसह यशवंत विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी तसेच कथामाला कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
कथामालेसाठी अकरा हजाराचा निधी : उद्घाटनप्रसंगी साने गुरुजी कथामाला संस्काराचे वारकरी महोत्सव समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा.बसवराज कोरे म्हणाले, की शिक्षकांनी विद्यार्थ्यात सेवा,शिस्त आणि श्रमदान यातून श्रमसंस्काराचे धडे दिले पाहिजे. सद्य परिस्थिती पाहता जीवनाला आकार देणारे मूल्यसंस्काराचे विचार स्वीकारले पाहिजे, असे नमूद करून कथामालेच्या कार्यासाठी ११ हजार रुपये निधी जाहीर केला.
विभागीय कथाकथन स्पर्धा निकाल असा : बालगट : प्रथम : अमृता अनिल कांबळे (अहिल्यादेवी प्राथमिक विद्यालय, जालना), द्वितीय : अक्षरा गजानन पवार (नूतन कन्या प्रशाला सेलू), तृतीय : धैर्यशील नागराज मुळे (महात्मा फुले विद्यालय,अहमदपूर), किशोरगट : प्रथम : प्रतीक्षा छत्रगुण मोगल (नूतन कन्या प्रशाला,सेलू) द्वितीय : आरती राजेंद्र गाडेकर ( जि.प.प्रशाला जाफराबाद), तृतीय : रत्नवीर प्रविण दवणे (महात्मा गांधी विद्यालय,वसमत)
छायाचित्रे : सदाशिव महाजन, किरण फोटो, सेलू