IPPB : सेलूतील धनलक्ष्मी पतसंस्थेकडून पत्रकारांना विमा कवच : अशोक काकडे; विविध तरतुदींसह दहा लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण
धनलक्ष्मी पतसंस्था, बळीराजा संघर्ष समिती, व्हाईस ऑफ मीडिया, डाक विभागाचा संयुक्त उपक्रम
सेलू जि.परभणी : पत्रकारांना विमा कवच असणे गरजेचे आहे, यासाठी बळीराजा संघर्ष समितीच्या सहकार्याने धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेकडून सेलूतील पत्रकारांचा डाक विभागाच्या सहकार्याने विमा काढण्यात आला आहे. पतसंस्थेचा हा उपक्रम स्तुत्य आहे, असे मत माजी जिल्हा परिषद सभापती तथा बळीराजा संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक काकडे यांनी शनिवारी, २० जानेवारी रोजी व्यक्त केले. सेलूतील पत्रकारांनी भारतीय डाक विभागाच्या या विमा योजनेचा लाभ घ्यावा. धनलक्ष्मी नागरी सहकारी बॅंक यासाठी कटिबद्ध आहे, असल्याचे काकडे यांनी नमूद केले.
धनलक्ष्मी महिला पतसंस्था, व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघ व डाक विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित कार्यक्रमात काकडे बोलत होते. याप्रसंगी भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमार्फत, पत्रकार, पतसंस्था कर्मचारी तसेच बळीराजा संघर्ष समितीच्या सदस्यांचा कॅशलेस अपघाती विमा काढण्यात आला. यावेळी अशोक काकडे, जेष्ठ पत्रकार नारायण पाटील, व्हाईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, सचिव शिवाजी आकात, सुधाकर रोकडे, रमेश डख, रमेश माने, विजय भुजबळ, डाक विभागाचे लक्ष्मण नवघरे, नितीन शिंदे, मन्मय भिसे, पवन बारडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. सेलूतील सर्व पत्रकारांनी डाक विभागाच्या या विमा योजनेचा लाभ घ्यावा. धनलक्ष्मी नागरी सहकारी बॅंक यासाठी कटिबद्ध आहे, असे अशोक काकडे यांनी नमूद केले.
भारतीय डाक विभागाची ही योजना १८ ते ६५ वर्ष वयोगटातील सर्व नागरिकांसाठी आहे. अपघातात मृत्यू कायमस्वरूपी किंवा अंशतः अपंगत्व आल्यास पॉलिसी धारकाला १० लाख रुपये विमा कवच मिळणार आहे. तसेच रुग्णालयातील खर्चासाठी १ लाख मिळणार असून अपंगत्व आलेल्या व्यक्तीच्या मुलांना शिक्षण खर्च साठी १ लाख मिळणार आहेत. रुग्णांच्या कुटूंबाला रुग्णवाहिकेसाठी २५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. तसेच मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटूंबाला लागणाऱ्या अंत्यसंस्कारासाठी ५ हजाराची तरतूददेखील आहे. या विमा योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे डाक विभागाचे लक्ष्मण नवघरे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
प्रास्ताविकात अशोक उफाडे व डाक विभाग विमा प्रतिनिधी शंभू काकडे यांनी या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून पत्रकारांचा अपघाती विमा उतरल्याबद्दल आभार मानले . लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकाराला अपघातात आधार देण्याचे काम दहा लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण देतसेलू येथील धनलक्ष्मी महिला नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून अशोक काकडे यांनी केले आहे. लोकप्रतिनिधी पत्रकारांचा सत्कार करतात, गिफ्ट देतात. परंतु अपघातात अपंगत्व आल्यानंतर त्यांना व त्यांच्या कुटुंबाला आधार देण्याचे काम विमा पॉलिसी करते. पत्रकार, पतसंस्थेचे कर्मचारी तसेच बळीराजा संघर्ष समितीच्या सदस्यांचा अपघाती विमा काढून काकडे यांनी त्यांना विमा कवच मिळवून दिले आहे, असे मत डाक विभागाचे लक्ष्मण नवघरे यांनी या वेळी व्यक्त केले. अपघातात मृत्यू कायमस्वरूपी किंवा अंशतः अपंगत्व आल्यास पॉलिसी धारकाला १० लाख रुपये विमा कवच मिळणार आहे .तसेच रुग्णालयातील खर्चासाठी १ लाख मिळणार असून अपंगत्व आलेल्या व्यक्तीच्या मुलांना शिक्षण खर्च साठी १ लाख मिळणार आहेत. रुग्णांच्या कुटूंबाला रुग्णवाहिकेसाठी २५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. तसेच मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटूंबाला लागणाऱ्या अंत्यसंस्कारासाठी ५ हजाराची तरतूददेखील आहे, असे नवघरे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.