बुध्द विहारांच्या विकासासाठी प्राधान्याने निधी : पालकमंत्री संजय बनसोडे

बुध्द विहारांच्या विकासासाठी प्राधान्याने निधी : पालकमंत्री संजय बनसोडे

पूर्णा येथील सामाजिक न्याय विभागाच्यावतीने उभारण्यात आलेल्या इमारतीचे लोकार्पण

बुध्द विहारांच्या विकासासाठी प्राधान्याने निधी : पालकमंत्री संजय बनसोडे

परभणी : बुद्ध विहारांच्या विकास आणि सोयी सुविधाकरीता आवश्यक तेवढा निधी प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी बुधवारी, ३१ जानेवारी रोजी दिली. पूर्णा येथील भदंत उपाली थेरो नगर परिसरात सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या इमारतीचे लोकार्पण आणि अजिंठा कमानीचे उद्घाटन कार्यक्रमात पालकमंत्री संजय बनसोडे बोलत होते. यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधिक्षक रागसुधा आर., मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, जिवराज डापकर, भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो, भिक्खू करुणानंद महोथेरो, भिक्खू डॉ.ली ची रॅन, भिक्खू हाँग जीन सू, गीता गुठ्ठे, राजेश विटेकर, प्रकाश कांबळे आदींची उपस्थिती होती.

या वेळी पालकमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, बुध्द विहार हे संस्कार केंद्र आहेत. या विहारात कोणीही आल्यास त्या व्यक्तीस एक वेगळी ऊर्जा प्राप्त होत असते. पूर्णा येथे मागील अनेक वर्षापासून भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या माध्यमातून धम्म परिषदेचे आयोजन होत आहे. अनेक उपासक उपासिका या परिषदेस उपस्थित राहून धम्माचा प्रचार प्रसार करीत आहेत. पूर्णा हे बौध्द धर्म चळवळीचे केंद्र बनले आहे. बुध्द विहाराच्या सर्वागिंण विकासाकरीता तसेच त्यास ब दर्जा देण्याचा प्रयत्न करुन आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ या डॉ. बाबासाहेबांच्या ब्रीद वाक्याने आपण पुढे चालत आहोत. शिक्षणांचे महत्व व आपण का शिकले पाहिजे हे बाबासाहेबांनी त्यांच्या कार्यातून आपल्याला शिकविले आहे. आपला देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन प्रगती करत आहे. तसेच राज्य शासन देखील त्यांच प्रेरणेनेच राज्यात विविध विकासनशील योजना राबवित आहे. डॉ. बाबासाहेबांमुळेच आपली प्रगती झाली असुन, संपूर्ण जगाला जीवनाचा मार्ग दाखविणारा त्यांचा संदेश सदैव आपल्यासाठी दिशादर्शक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारक उभारणी कार्यात मला स्वतः लक्ष घालण्यास सांगितले आहे. याकरीता आंबेडकरी चळवळीतील सर्व नेत्यांची एक समिती तयार करण्यात आली आहे. या समितीने स्मारक उभारणीबाबत अत्यंत बारिक-सारिक सूचना दिल्या असून, हे आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत हे जागतिक दर्जाचे दर्जेदार स्मारक पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.

महापरिनिर्वाण दिनी (६ डिसेंबर) राज्यभर सार्वजनिक सुट्टीची मागणी

भिमा कोरेगाव येथे होणारा शौर्य दिनाचा कार्यक्रम राज्य शासनामार्फत आयोजित करण्याचे ठरविले आहे. तसेच त्याठिकाणी भव्य असे स्मारक देखील उभारण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. तसेच ६ डिसेंबर म्हणजे महापरिनिर्वाण दिनी राज्यभर सार्वजनिक सुट्टी देण्याची मागणी करण्यात आली आहे. येथील बुध्द विहाराच्या विकासासाठी आज ज्या काही मागण्या करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे प्रस्ताव तात्काळ पाठवून दिल्यास, याकरीता पाठपूरावा करुन निधी लवकर उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे सांगुन, सर्व समाजाला सोबत घेवून हे शासन विकासाचे काम करत आहे. समाजासाठी जे-जे करता येईल ते करण्याचा मी प्रामणिक प्रयत्न करेल असेही श्री. बनसोडे यावेळी म्हणाले.प्रास्ताविक जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले. यावेळी भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो, आमदार रत्नाकर गुट्टे, राजेश विटेकर यांनी समयोचित मार्गदर्शन केले. प्रारंभी पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त सामाजिक न्याय विभागाकडून उपलब्ध झालेल्या निधीतून उभारण्यात आलेल्या इमारतीचे लोकार्पण आणि अजिंठा कमानीचे उद्घाटन करण्यात आले.

बुध्द विहारांच्या विकासासाठी प्राधान्याने निधी : पालकमंत्री संजय बनसोडे

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!