आरक्षण वाचविण्यासाठी ‘ओबीसीं’चे सेलूत आंदोलन
सेलू जि.परभणी : राज्यातील ओबीसी, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचे आरक्षण वाचवावे या मागणीसाठी गुरुवारी, एक फेब्रुवारी रोजी सेलू येथील सकल ओबीसी समाज बांधवांच्या उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. तहसीलदार दिनेश झांपले तसेच उपजिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी मनोहर चिंचाणे यांनी निवेदन स्वीकारले. राज्य सरकारने मराठा आरक्षणा संदर्भात ‘सगे सोयरे’ या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याविषयी मसुदा काढला आहे. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा निर्णय ओबीसीवर अन्याय करणारा आहे. या निर्णयाला विरोध दर्शवत अधिसूचनेचा मसुदा रद्द करावा, राज्य मागासवर्ग आयोग व न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करावी. कुणबी प्रमाणपत्र वितरणाला स्थगिती द्यावी. राज्यातील गोर गरीब ओबीसी, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचे आरक्षण वाचवावे अशी मागणी करण्यात आली आहे. आहे. या वेळी गणेश नाईकवाडे, प्रभाकर इंगळे, भागवत दळवे, विठ्ठल कोकर, संजय साडेगावकर, पवन कटारे, पंडित जगाडे, विठ्ठल कोकर, शामराव कटारे, रवि कटारे माऊली राऊत, संदीप बोकन, बालू काजळे, बालाजी चिंचाणे, सुदर्शन कटारे, सुदर्शन, सुदर्शन हातकडके,बालासाहेब जावळे, पंकज वायाळ, भागवत जाधव, प्रल्हाद तारडे, सुदाम रोकडे, चेतन गो,रे बालाप्रसाद राठोड यांच्यासह ओबीसी बांधव उपस्थित होते.