माजी आमदार भांबळे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी “शेतकरी आक्रोश मोर्चा”

माजी आमदार भांबळे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी “शेतकरी आक्रोश मोर्चा”

जिंतूर, सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी, जिंतूर तहसील कार्यालयावर धडकणार मोर्चा

माजी आमदार भांबळे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी "शेतकरी आक्रोश मोर्चा"

जिंतूर जि.परभणी : जिंतूर व सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने पाठ फिरवल्यामुळे विविध मागण्या मंजूर करण्यासाठी माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी, सहा फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालय येलदरी रोड जिंतूर येथून तहसील कार्यालय जिंतूर येथे “शेतकरी आक्रोश मोर्चा” काढण्यात येणार आहे. शेतकरी, नागरिक, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिंतूर व सेलू तालुक्यात चालू वर्षात कमी पाऊस झाल्या मुळे शेतकरी राजा आडचणीत आला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव नाही, झालेल्या शेतीपिकाची नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही तसेच पिक विमा देखील मंजूर करण्यात आलेला नाही, सध्या जिल्ह्यातील कोरडा दुष्काळ पाहता पाणी टंचाई, चारा छावण्या, पुरेसी बीज ई. नियोजन करणे गरजेचे आहे त्याबाबत आम्ही वरील संदर्भीय विषयानुसार जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन दिलेले होते परंतु शासन व प्रशासनाची शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत उदासीन भूमिका दिसून येते.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या : जिंतूर व सेलू तालुक्यात भीषण दुष्काळ असताना देखील शासनाने सौम्य दुष्काळ जाहीर केलेला आहे. दुष्काळाची परिस्थिती तरी सौम्य दुष्काळ नसून तीव्र दुष्काळ जाहीर करण्यात यावा व तीव्र दुष्काळाच्या सर्व आर्थिक मदती व दुष्काळ काळातील सर्व कामे युद्ध पातळीवर सुरु करण्यात यावे, सद्य परिस्थितीत चालू वर्षात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे सोयाबीन व कापूस उत्पन्नाचे प्रमाण कमी झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा या करिता शासनाने सोयाबीनला ८,०००/- रु व कापूस पिकास १२,०००/- रु दराने खरेदी करण्यासाठी आदेश काढावे किंवा शासकीय खरेदीकेंद्र चालू करण्यात यावेत. सन २०२१-२२ च्या ऑगष्ट महिन्यामधील सततच्या पावसाने नुकसान झाल्यामुळे शासनाकडून १३,६००/- स एवढी प्रति हे. अशी मदत जाहीर करण्यात आली होती. परंतु, जिंतूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर तुटपुंजी रक्कम देऊन शेतक‌ऱ्याची फसवणूक झालेली आहे त्यामुळे उर्वरित रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी. मागील वर्षीचा व यावींचा सन २०२३ २४ चा पिक विमा शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही तो तात्काळ मंजूर करून शेतकयांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्यात यावा. जिंतूर व सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी इन्शुरन्स कंपनीकडे पिक विम्याच्या अनेक तक्रारी केल्या होत्या त्या कंपनीने ८० टक्के रद्द केले आहेत व त्यापैकी फक्त २० टक्के तक्रारी मंजूर केल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या सर्व शंभर टक्के प्राप्त तक्रारी मंजूर करून त्यांना पीक विमा मंजूर करण्यात यावा व वाटप करण्यात यावा.

जिंतूर तालुक्यात सोयाबीन, कापूस, तूर, हळद, फळबाग ई. पिक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. चालू वर्षात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे शेतकरी आडचणीत आलेला आहे. त्यामुळे जिंतूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा व तसेच पिक विमा कंपनीने पंचनामे करून रक्कम अदा करण्यासाठी आदेशित करण्यात यावे. तसेच शासनाकडून सुद्धा शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी. चालू वर्षांत पीकविमा कंपनीने अजून शेतक:यांना काहीच मदत केलेली नाही. यामध्ये शेतक‌यांना शंभर टक्के अग्रीम मंजूर करण्यात यावा. महाराष्ट्रात तसेच परभणी जिल्ह्यातील जिंतूर व सेलू तालुक्यात शेतक‌यांचे कर्ज धकलेले आहेत. त्यामुळे शेतवल्यांना सरसगट कर्ज माफी देण्यात यावी. सन २०१८ मध्ये काही मंडळात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरपाई शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आली होती. ती आज पर्यंत शेतकयांना मिळालेली नाही ती तात्काळ अदा करण्यात यावी. चालू वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे नागरिकांची तसेच जनावरांची पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाकडून चारा छावणी व विहीर, बोअर अधिग्रहण व नवीन बोजर घेण्यासाठी आजपासून त्याचे नियोजन करण्यात यावे, जिंतूर व सेलू तालुक्यातील सर्वच ३३ के.व्ही. सबस्टेशन ओव्हरलोड झालेले आहेत. त्यामुळे शेतकयांना सुरळीत वीज पुरवठा होत नाही. त्यामुळे तालुक्यातील सर्व ३३ के.व्ही. सब स्टेशनसाठी नवीन ५ चे ट्रान्सफार्मर मंजूर करण्यात यावे.

जिंतूर व सेलू तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात गावठाणचे डी.पी. ओव्हरलोड झाल्यामुळे ज्या ठिकाणी ६३ के.व्ही. चे डी.पी.आहेत त्या ठिकाणी १०० के.व्ही.चे डी.पी.बसवण्यात यावेत. तसेच काही भागात सिंगल फेस चे ट्रान्सफार्मर बसवलेले आहेत त्या ठिकाणी श्री फेसचे १०० चे ट्रान्सफार्मर मंजूर करण्यात यावेत. जिंतूर व सेलू तालुक्यात शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा करण्यात यावा व शेतकऱ्यांचे दुष्काळ परिस्थितीमुळे संपूर्ण वीज बिल माफ करण्यात यावे. मागील दोन वर्षापासून जिंतूर व सेलू तालुक्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सिंचन विहिरीची कामे केलेली असून त्यांची कुशलची बिले अजून अदा करण्यात आलेली नाहीत ती तात्काळ अदा करण्यासाठी संबंधीतास आदेशित करण्यात यावे.

जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे व नागरिकांचे विविध गंभीर स्वरूपाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत परंतु वरील सर्व ज्वलंत प्रश्नाबाबत शासन व प्रशासन उदासीन भूमिकेत असल्यामुळे शासनाचा निषेध म्हणून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय जिंतूर येथून तहसील कार्यालयावर मंगळवारी दुपारी १२ वाजता “शेतकरी आक्रोश मोर्चा” काढण्यात येणार असून जिंतूरच्या तहसीलदारांना याबाबत निवेदन देण्यात आले. या वेळी मनोज थिटे, रामराव उबाळे, विठ्ठलराव घोगरे, गणेशराव इलग, शरदराव अंभूरे, शरदराव मस्के, प्रकाशराव शेवाळे, दिलीपराव डोईफोडे, दत्तराव काळे, मनोहर डोईफोडे, अहेमद बागवान, दलमीर पठाण, बंटीभाऊ निकाळजे, शौकत लाला, अक्कू लाला, खय्युम कादरी, अविनाश मस्के, माधव घोगरे, मोसिन भाई, राहुल घुले, किसन मानवते, श्रीराम जाधव, अस्लम कुरेशी इत्यादींसह अनेक राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!