समृद्ध जीवनासाठी सकारात्मक राहा : डीवायएसपी सुनील ओव्हाळ; आहेर बोरगावच्या नितीन माध्यमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात
विद्याधन सर्वश्रेष्ठ धन आहे. विद्येमुळे जीवनाला अर्थ प्राप्त होतो. एकाग्रता ही यशाची गुरुकिल्ली आहे. ज्या विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि एकाग्रता राहील तो उच्च पदावर जाईल. बुद्धिमान विद्यार्थीच यशाचे शिखरे गाठतात. – सुनील ओव्हळ, उपविभागीय पोलिस अधिकारी
सेलू,जि.परभणी :विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करावी. यश परिस्थितीवर नाही, तर मन:स्थितीवर अवलंबून असते. म्हणून समृद्ध जीवनासाठी सकारात्मक राहणे गरजेचे आहे, असे मत सेलूचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील ओव्हाळ यांनी एक फेब्रुवारीरोजी आहेर बोरगाव (ता.सेलू जि.परभणी) येथे केले. नितीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या स्नेहसंमेलनप्रसंगी श्री.ओव्हाळ बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र लहाने होते. या वेळी ग्रामीण कवी आत्माराम कुटे, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, बापूराव लहाने, ज्ञानेश्वर लिपणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. श्री. ओव्हळ म्हणाले, ” विद्याधन सर्वश्रेष्ठ धन आहे. विद्येमुळे जीवनाला अर्थ प्राप्त होतो. एकाग्रता ही यशाची गुरुकिल्ली आहे. ज्या विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि एकाग्रता राहील तो उच्च पदावर जाईल. बुद्धिमान विद्यार्थीच यशाचे शिखरे गाठतात.” कवी कुटे यांनी शेतकऱ्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक कविता सादर केल्या. प्रारंभी राष्ट्रमाता, राजमाता मॉं साहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पायल गवारे आणि संच यांनी स्वागतगीत गायीले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर सोळंके यांनी केले. गंगाधर आवचार यांनी पाहुण्याचा परिचय दिला. प्रास्ताविक पांडुरंग लाडाने यांनी केले. विष्णू आंधळे यांनी आभार मानले. सुरेंद्र दिशागत, आबासाहेब बिडवे, कैलास चोकनफळे, कैलास पुंगळे, सुरेखा आहेरकर, राजाभाऊ चव्हाण, संतोष तायडे, शिवाजी काळे, कैलास कदम, हनुमान वाघ, भगवान पवार, अजिंक्य खरात आदींनी परिश्रम घेतले.