लोअर दुधना धरणाची कामे तात्काळ पूर्ण करा : सेलू तालुका दबाब गटाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
सेलू जि.परभणी : तालुक्यातील लोअर दुधना धरणाची कामे तात्काळ पूर्ण करावीत अशी मागणी सेलू तालुका दबाब गटाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. लोअर दुधना धरणाचे काम १९८०च्या आसपास सुरू झाले मात्र अद्याप धरणांत १०० टक्के समतेने पाणी साठवणूक होत नाही. त्यामुळे या भागातील 458धरणाचे लाभक्षेत्रामधील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. केवळ अधिकारी वर्गाच्या बेजबाबदारपणामुळे व वेळकाढूपणामुळे थोड्याच गावांचे जमीन संपादन काम बाकी आहे. व्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा, जेणेकरून भूसंपादनाचे काम जलदगतीने पूर्ण होऊन धरणात १०० टक्के पाणी साठवणूक करणे शक्य होईल.या साठी सर्व संबंधीत अधिकारी यांना भूसंपादनाचे काम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश देण्यात यावे व या संदर्भातील प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठविण्याबाबत सक्त सूचना देण्यात याव्यात. देखील संबंधीत अधिकारी यांचा निष्काळजीपणा जबाबदार आहे. धरणातील पाणी साठा ११० टक्के झाल्यास भविष्यात शेतीसाठी, तसेच पिण्याचे पाणीसाठी अडचण होणार नाही. सध्या धरणात केवळ ७५ टक्के पाणी साठवणूक होते, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर ॲड श्रीकांत वाईकर, इसाक पटेल, ओमप्रकाश चव्हाळ, विलास रोडगे, ॲड.टी. ए. चव्हाण, लिंबाजी करलाल, ॲड.देवराव दळवे,ॲड.योगेश सुर्यवंशी, दिलीप मगर, मुकुंद रेकाळे, परमेश्वर काटे, लक्ष्मण प्रधान सतिश काकडे, रामचंद्र कांबळे, हत्ताराव कांगणे, परमेश्वर वीर, ॲड. उमेश काष्टे, अजित मंडलीक, राजेंद्र केवारे, नारायण पवार, उदव सोळंके, आबासाहेब भुजबळ, शेख मतीन दादामिया, रोफ भाई, रोफ भाई, चंद्रकांत चौधरी, किरण डुग्रेकर, जलाल भाई, उत्तम गवारे, डॉ.गणेश थोरे, चिंतामन दौंड, भारत खंदळे, रामचंद्र आघाव, गणेश सोळंके, मोहन खापरखुटीकर आदींच्या सह्या आहेत.