क्रांतिकारकांचे स्मरण नित्य करा :जयप्रकाश बिहाणी
सेलू : अनेक क्रांतिकारकांनी आपले सर्वस्व या भारतभूमीसाठी अर्पण केले. अशा सर्व क्रांतिकारकांचे सदैव स्मरण आपण केले पाहिजे. या जाणीवेने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करूया, असे प्रतिपादन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी यांनी रविवारी, सात ऑगस्ट रोजी केले.
सेलू येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय, नगरपरिषद व गटशिक्षणाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त साई नाट्य मंदिरात समूहगान, समूहनृत्य स्पर्धा झाली. त्यावेळी अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करतांना श्री बिहाणी बोलत होते.
उद्घाटक माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार दिनेश झांपले. मुख्याधिकारी देविदास जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे, राम मैफळ, मुख्याध्यापिका संगीता खराबे, उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल यांची प्रमुख उपस्थिती होती. सरस्वती पूजन तथा रंगदेवता नटराज यांच्या प्रतिमपूजनाने स्पर्धेला सुरुवात झाली. स्वागतगीत सच्चिदानंद डाखोरे यांनी गायले, तर तबला साथ प्रद्युम्न सावरगावकर यांनी दिली. प्रास्ताविक अरुणा संगेवार यांनी खूप. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित विविध उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन संगेवार यांनी यावेळी केले. तालुक्यातील 51 शाळा स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. परीक्षक म्हणून गंगाधर कान्हेकर, अनघा पांडे, शंतनू पाठक, उज्वला मालाणी, कांचन बाहेती, सीमा काळबांडे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन कीर्ती राऊत, रेणुका अंबेकर, श्रीकांत नेवरेकर यांनी केले, तर आभार भालचंद्र गांजापूरकर यांनी मानले.
कार्यक्रमादरम्यान भारत माता की जय, या घोषणांनी सभागृह दणाणून गेले. स्पर्धेसाठी कैलास मलवडे, सुषमा दामा, सीमा सूक्ते, किशोर ढोके, विनोद शिंदे, सुनिल मोगल, अनंत बोराडे, सुरेखा आगळे, यशवंत कुलकर्णी, प्रकाश खराटे आदींनी परिश्रम घेतले.
हेही वाचा : सामूहिक राष्ट्रगीताने फुलले चैतन्य