श्रीरामजी भांगडिया व्याख्यानमाला : हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा धगधगता वारसा समजून घेण्याची गरज
ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव यांचे मत, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचा उपक्रम
सेलू : मराठवाड्याला त्याग, बलिदानाची मोठी परंपरा आहे. हैदराबाद मुक्तिसंग्राम हा शोषणा विरूद्ध, अस्मितेसाठी समर्पित भावनेने लढलेला लढा होता. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचणे आणि हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा धगधगता वारसा समजून घेणे गरजेचे आहे. असे मत ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव यांनी व्यक्त केले.
येथील साई नाट्यगृहात बुधवारी, २५ जानेवारी रोजी सायंकाळी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमालेत भालेराव बोलत होते. अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया हे होते. पुढे बोलताना निशिकांत भालेराव म्हणाले की, “बलाढ्य जुलमी राजवटीच्या विरोधात सर्व सामान्यांनी निकराने दिलेला हा लढा होता. शासनात समान सहभाग आणि जबाबदार राज्य पध्दत असावी. ही सर्व स्वातंत्र्य सैनिकांची मागणी होती. हैदराबाद मुक्तिसंग्राम हा आपला धगधगता वारसा असून, भारतीय स्वातंत्र्याला हैदराबाद मुक्तीनंतरच पूर्ण विराम मिळाला.” कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्याख्यानमालेचे संयोजक प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन सहसंयोजक प्रा. सुभाष बिराजदार यांनी केले. तर आभार अशोक लिंबेकर यांनी मानले. नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सदस्य दत्तराव पावडे, श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक नारायण सोळंके, एस.डी. बेंडसुरे, मुख्याध्यापक संगीता खराबे, प्रभारी प्राचार्य डॉ. महेंद्र शिंदे, संस्थेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.
निशिकांत भालेराव म्हणाले की, “बलाढ्य जुलमी राजवटीच्या विरोधात सर्व सामान्यांनी निकराने दिलेला हा लढा होता. शासनात समान सहभाग आणि जबाबदार राज्य पध्दत असावी. ही सर्व स्वातंत्र्य सैनिकांची मागणी होती. हैदराबाद मुक्तिसंग्राम हा आपला धगधगता वारसा असून, भारतीय स्वातंत्र्याला हैदराबाद मुक्तीनंतरच पूर्ण विराम मिळाला.”
हेही वाचा : Motivational : सशक्त पिढीच सशक्त समाज घडविते : डॉ.अश्वमेध जगताप यांचे प्रतिपादन
हेही वाचा : बालविवाह : करू देणार नाही; करणारी नाही, सेलूतील मुलींनी घेतली शपथ