बलशाली भारतासाठी नैतिक बळ वाढावे; आंतरभारती दिनानिमित्त अजमेरला कार्यक्रम 

बलशाली भारतासाठी नैतिक बळ वाढावे; आंतरभारती दिनानिमित्त अजमेरला कार्यक्रम

बलशाली भारतासाठी नैतिक बळ वाढावे; आंतरभारती दिनानिमित्त अजमेरला कार्यक्रम 

Authored By Babasaheb Helaskar

परभणी : सर्व समस्यांचे समाधान शिक्षणातून मिळते. देशातील कष्टकरी, शेतकरी, युवक, महिला व नागरिक सशक्त व्हावा; तसेच बलशाली भारतासाठी सर्वच क्षेत्रातील घटकांना आणि देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतःमध्ये नैतिक बळ वाढविण्याची नितांत गरज आहे, असा सूर आंतरभारती दिनानिमित्त आयोजित परिसंवादातून निघाला.

पूज्य सानेगुरुजी यांनी स्थापन केलेल्या आंतरभारती ट्रस्टच्या वतीने बुधवारी, १० मे रोजी अजमेर (राजस्थान) येथील महर्षी दयानंद निर्वाण स्मारक न्यास सभागृहात आंतरभारती दिन, आमसभा, खुले चर्चासत्र यासह विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी आंतरभारती ट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य डॉ.पांडुरंग नाडकर्णी, प्रमुख पाहुणे म्हणून महर्षी दयानंद निर्वाण स्मारक न्यासचे अध्यक्ष माजी आमदार गोपाल बाहेती, कार्याध्यक्ष अमर हबीब, उपाध्यक्ष संगीता देशमुख, सचिव डॉ.डी.एस.कोरे, विश्वस्त प्रतापसिंह डांगी, मधुश्री आर्य, मनीषा आर्य आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

बलशाली भारतासाठी नैतिक बळ वाढावे; आंतरभारती दिनानिमित्त अजमेरला कार्यक्रम 

‘बलसागर भारत होवो’ या विषयांवरील परिसंवादात गोपाल बाहेती, उमेश श्रीवास्तव, अमर हबीब, संगीता देशमुख यांनी विचार मांडले. प्रारंभी आंतरभारतीचे माजी अध्यक्ष डॉ.सदाविजय आर्य व ॲड. कृष्णमंगलसिंह कुलश्रेष्ठ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

या वेळी कार्याध्यक्ष हबीब यांनी आंतरभारतीच्या कार्याची रुपरेषा स्पष्ट केली. गाव, शहर तेथे शाखा विस्तार, आंतरभारती दूत, राष्ट्रीय निबंध स्पर्धा, महिलांचा शांती मार्च, चिंतन शिबीर, भारत दर्शन आणि बाल आनंद महोत्सवाचे आयोजन या सप्तसुत्रीनुसार कार्यकर्त्यांनी कार्यरत राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

बलशाली भारतासाठी नैतिक बळ वाढावे; आंतरभारती दिनानिमित्त अजमेरला कार्यक्रम 

‘जोडो जोडो, भारत जोडो’ हा नारा देणारे ‘आंतरभारती’ एक देश आंदोलन आहे, असे नाडकर्णी समारोपप्रसंगी म्हणाले. सूत्रसंचालन संयोजक संजय माचेवार यांनी केले. मनीषा आर्य यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी संयोजक शिवलिंग मठपती, शिवाजीराव सूर्यवंशी, रमेश जिंतूरकर, राजू जांगीड, राहुल आर्य, ॲड.नातू सिंग यांच्यासह‌ पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महाराष्ट्रासह विविध राज्यांतील आंतरभारतीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. दरम्यान, ११ ते १८ मेपर्यंत आंतरभारतीचे सदस्य राजस्थान यात्रा करणार आहेत. राजस्थानचे लोकजीवन, संस्कृती अनुभवणार आहेत. विविध ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणार आहेत.

 

या वेळी कार्याध्यक्ष अमर हबीब यांनी आंतरभारतीच्या कार्याची रुपरेषा स्पष्ट केली. गाव, शहर तेथे शाखा विस्तार, आंतरभारती दूत, राष्ट्रीय निबंध स्पर्धा, महिलांचा शांती मार्च, चिंतन शिबीर, भारत दर्शन आणि बाल आनंद महोत्सवाचे आयोजन या सप्तसुत्रीनुसार कार्यकर्त्यांनी कार्यरत राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.’जोडो जोडो, भारत जोडो’ हा नारा देणारे ‘आंतरभारती’ एक देश आंदोलन आहे, असे अध्यक्ष प्राचार्य डॉ.पांडुरंग नाडकर्णी समारोपप्रसंगी म्हणाले.


देशभरात आंतरभारती दूत नेमणार 

विविध मागण्यांसाठी जिल्हाभरात पत्रकारांचे धरणे; परभणीत प्रशासनाला निवेदन

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!