विरोधकांचा आवाज दडपविणे थांबवा; अन्यथा तीव्र आंदोलन, जिंतूर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा इशारा

विरोधकांचा आवाज दडपविणे थांबवा; अन्यथा तीव्र आंदोलन, जिंतूर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा इशारा

जिंतूर येथे माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन

जिंतूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांना सूडबुद्धीने पाठवलेली ईडी कार्यालयाच्या नोटीस प्रकरणी जिंतूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी, 23 मे रोजी निवनेदन देण्यात आले. महाराष्ट्रात विरोधकांचा आवाज दडपण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. ईडी, सीबीआय अशा केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून सक्षम विरोधी पक्षांची मुस्कटदाबी केली जात आहे. हे वेळीच थांबवा; अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे, की माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब यांच्यावर १०० कोटी पेक्षा जास्त रकमेच्या भ्रष्टाचाराचा ठपका ठेवला गेला. त्यातून त्यांना १३ महिने तुरुंगात राहावे लागले. मात्र चौकशीत काहीही निष्पन्न झाले नाही. माजी मंत्री नवाब मलिक साहेब यांनासुद्धा त्यांनी प्रशासनातील काही चुकीच्या गोष्टी लोकांसमोर आणल्यामुळे तुरुंगात डांबण्यात आले. त्याचप्रमाणे जेष्ठ नेते हसन मुश्रीफ व अन्य महाविकास आघाडीच्या नेत्यांनासुद्धा ईडी कार्यालयाची भीती दाखवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या कडून सातत्याने होतांना दिसून येत आहे. भाजप सत्तेत असलेल्या राज्यात लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवून सत्तेचा गैरवापर करीत आहे. त्यामुळे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती लोप पावत असून विरोधकांना संपविण्याचे विध्वंसक राजकारण देशाच्या व राज्याच्या हिताचे नाही. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष व प्रमुख नेते  जयंतराव पाटील यांना याच भावनेतून सूडबुद्धीने ईडी कार्यालयाची नोटीस पाठवण्यात आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनमाणसांमध्ये टोकाची भावना आहे. त्या भावना राज्यसरकार व केंद्र सरकारला आपल्या मार्फत पाठवण्यात याव्यात. जयंतराव पाटील यांच्या सारख्या चारित्र्य संपन्न व निष्कलंक व्यक्तिमत्व असणाऱ्या नेत्याचे खच्चीकरण व्हावे, याच भावनेतून केंद्रीय यंत्रणाच्या नोटीस पाठवून त्यांना नाहक त्रास दिल्या जात आहे. या सर्व बाबतीत राजकीय हेतूने भाजप सरकार पडद्या मागून खेळ करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. अशा कारवाया तात्काळ थांबविण्यात याव्यात अन्यथा; जिंतूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा निवेदनात दिलेला आहे. या वेळी माजी आमदार विजयराव भांबळे, प्रसादराव बुधवंत, मनोज थिटे, बाळासाहेब घुगे, रामराव उबाळे, अभिनय राऊत, विठ्ठल घोगरे, गणेशराव ईलग, दल्मीर पठाण, चंद्रकांत बहिरट, शाहेद बेग मिर्झा, अहमद बागबान, रमेश गीते, श्रीकृष्ण थिटे, मकसूद पठाण, खय्युम भाई, श्याम सारंग, वसंत राठोड, गंगाधर तरटे परमेश्वर राठोड,शाहेद सिधीक्की, पिंटू वलेकर, बालाजी घुगे, जगन काळे, सुधाकर मस्के, बबलू कदम, शंकर माने, धर्मा राठोड, ज्ञानेश्वर निर्मळ, विश्वंबर पडघन, दिनकर आलाटे, दिनकर सातपुते, माणिक सानप, असलम कुरेशी, दिगंबर कुटे, रामूकाका अंभुरे, कपिल जाधव, अहेमद पठाण कोक, अंगद देशमुख, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या सारख्या चारित्र्य संपन्न व निष्कलंक व्यक्तिमत्व असणाऱ्या नेत्याचे खच्चीकरण व्हावे, याच भावनेतून केंद्रीय यंत्रणाच्या नोटीस पाठवून त्यांना नाहक त्रास दिल्या जात आहे. या सर्व बाबतीत राजकीय हेतूने भाजप सरकार पडद्यामागून खेळ करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.


तळागाळातील लाभार्थींपर्यंत शासकीय योजनांचा लाभ द्या : आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर

नवोदितांनी गांभीर्याने व्यक्त व्हावे : देविदास फुलारी; ‘मसाप’तर्फे देविदास कुलकर्णींना अभिवादन

१९ डब्ब्यांसह धावली नगरसोल एक्स्प्रेस, प्रवाशांच्या मागणीला यश

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!