१९ डब्ब्यांसह धावली नगरसोल एक्स्प्रेस, प्रवाशांच्या मागणीला यश
सेलू जि.परभणी : प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने काचीगुडा-नगरसोल-काचीगुडा (गाडी क्रमांक १७६६१/१७६६२) मध्ये चार डब्बे कायम स्वरूपी वाढविण्यात आले आहेत. मंगळवारपासून (२३ मे) ही गाडी १९ डब्ब्यांसह धावली. परतीच्या प्रवासात बुधवारपासून (२४ मे) नगरसोल ते काचीगुडा अशी एकूण १९ डब्ब्यांसह धावणार आहे. सुरुवातीला ही गाडी बारा, पुढे पंधरा डब्ब्यांसह पॅसेंजर म्हणून धावत होती. करोना काळात व पुढेही या गाडीला अनारक्षित एक्स्प्रेसचा दर्जा दिला गेला. त्यामुळे अंतर तेवढेच पण केवळ तिकिट दर वाढविला. आजही या गाडीला ८० रेल्वे स्थानकावर थांबा आहे. सर्वसामान्य प्रवाशांच्या दृष्टीने ही गाडी अत्यंत सोयीची आहे. मात्र, करोनानंतर दुप्पट-तिप्पट पैसे देऊन प्रवाशांना प्रवास करावा लागतो.शिवाय मूलभूत सोयीसुविधांचा वाणवा गाडीत जाणवतो. सततचा पाठपुरावा करूनही रेल्वे प्रशासन लक्ष देत नाही. शिवाय करोनाकाळात सेलू येथील थांबा रद्द केलेल्या अत्यंत जुन्या अंजता मेल एक्स्प्रेस तसेच साईनगर शिर्डी एक्स्प्रेसला पूर्ववत थांब्याचे आश्वासन रेल्वे मंत्री रावसाहेव दानवे विसरले की, काय अशी शंका प्रवाशांतून व्यक्त होत आहे.
करोनानंतर अंतर तितकेच पण दुप्पट-तिप्पट पैसे देऊन नगरसोल गाडीने प्रवाशांना प्रवास करावा लागतो. शिवाय मूलभूत सोयीसुविधांचा वाणवा या गाडीत जाणवतो. रेल्वे प्रवासी संघाचे पदाधिकारी सततचा पाठपुरावा करतात.मात्र, रेल्वे प्रशासन लक्ष देत नाही. शिवाय करोनाकाळात सेलू येथील थांबा रद्द केलेल्या अत्यंत जुन्या अंजता मेल एक्स्प्रेस तसेच साईनगर शिर्डी एक्स्प्रेसला पूर्ववत थांब्याचे आश्वासन रेल्वे मंत्री रावसाहेव दानवे विसरले की, काय अशी शंका प्रवाशांतून व्यक्त होत आहे.
विरोधकांचा आवाज दडपविणे थांबवा; अन्यथा तीव्र आंदोलन, जिंतूर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा इशारा
तळागाळातील लाभार्थींपर्यंत शासकीय योजनांचा लाभ द्या : आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर
नवोदितांनी गांभीर्याने व्यक्त व्हावे : देविदास फुलारी; ‘मसाप’तर्फे देविदास कुलकर्णींना अभिवादन