बनावट बी-बियाणे, खते व औषधींवर कठोर प्रतिबंध घाला : सेलू तालुका दबावगटाची मागणी
सेलू/परभणी : मागील खरीप हंगामात बनावट बी-बियाणे, खते व औषधांमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली. या पार्श्वभूमीवर यंदाच्या हंगामात अशा प्रकारांना पायबंद घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे. सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांच्या मार्फत मंगळवारी, २३ मे रोजी निवेदन पाठविण्यात आले. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते व औषधी मिळावेत यासाठी विशेष तपासणी पथक नेमावेत. केवळ जिल्हा परिषदच्या कृषी विभागाच्या हलगर्जी व बेजबाबदारपणामुळे मागील हंगामात शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली. या प्रकारांमुळे अधिकारी व संबंधित व्यापारीच मालामाल होतात. यावर वचक बसणे आवश्यक आहे. लोअर दुधना धरणातून डाव्या व उजव्या कालव्यात २७, २८ मेदरम्यान पाणी सोडल्यास शेतकरी बांधव कपाशीची लागवड करू शकतील, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर समन्वयक ॲड.श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाळ, गुलाब पोल उड़दव सोळंके, दत्ताराव कांगणे अ.रोफभाई, आबासाहेब भुजबळ, सतिश काकडे, उमेश काष्टे इसाक पटेल, लक्ष्मण प्रधान, दिलीप मगर, मुकर टेकाळे, प्रमोद काहे, नारायण पवार, विलास रोडगे, लिंबाजी कानाड, चंद्रकांत चौधरी, आबासाहेब भाबट आदींच्या सह्या आहेत.
सेलूतील साईबाबा बँकेतर्फे हजयात्रेकरू, सभापती अनिल नखाते यांचा सत्कार
१९ डब्ब्यांसह धावली नगरसोल एक्स्प्रेस, प्रवाशांच्या मागणीला यश
विरोधकांचा आवाज दडपविणे थांबवा; अन्यथा तीव्र आंदोलन, जिंतूर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा इशारा