…तर पालकांनी स्वतःमध्येच बदल करायला हवा : महेश पाटील; श्रीराम प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद

…तर पालकांनी स्वतःमध्येच बदल करायला हवा : महेश पाटील; श्रीराम प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद

SAKASHNEWS.COM

सेलू : बिघडत चाललेली कुटुंबातील संस्कृती, दुर्मीळ होत असलेले संस्कार, अशा बदलत्या सामाजिक परिस्थितीत खर्‍या अर्थाने पाल्याचे आयुष्य घडवायचे असेल, तर स्वतःपालक म्हणून आपल्यामध्येच बदल करायला हवा, असे मत अभियांत्रिकी महाविद्यालय सल्लागार समितीचे संचालक महेश पाटील यांनी व्यक्त केले.

येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित क्युरिअस किड्स प्रिन्स इंग्लिश स्कूल व ज्यू काॅलेज, प्राॅस्पेरस पब्लिक स्कूल व ज्ञानतीर्थ विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, १ जुलै रोजी ‘चला घडवूया, मुलांचे आयुष्य’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी उपस्थित पालकांना मार्गदर्शन करताना श्री पाटील बोलत होते.
अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे होते. सचिव डॉ सविता रोडगे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, शालिनी शेळके, करणसिंग चव्हाण आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

महेश पाटील म्हणाले, की आज पालकांची अवस्था चिंताजनक झाली आहे. कोणत्या प्रकारचे शिक्षण द्यावे, याबद्दल त्यांच्यात संभ्रम आहे. आठवीपर्यंत पालकांचे लक्ष कमी झाले आहे. पालक, शिक्षक, विद्यार्थी व संस्था हा चतु:सूत्री कार्यक्रम राबविला, तर विद्यार्थी नक्कीच यशस्वी होईल. याकरिता पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. प्रत्येक पालकांनी पाल्याच्या प्रगतीची विचारणा वेळोवेळी शाळेकडे करायला हवी. विद्यार्थ्याबाबत जागरूकता ठेवावी. विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवावे. मोबाईल पाल्याच्या आयुष्याशी खेळतोय, पाल्य अभ्यासापासून दूर जातोय, याची जाणीव हवी.

यावेळी प्रिन्स इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी श्रवण राठी, वेध जवळेकर, आर्यन सासवडे, विक्रम भाबट यांनी नीट परीक्षेत तसेच; आयटी जेईई परीक्षेत अनुराग हिवरे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. गुणवंतांनी सत्काराला उत्तर दिले. डॉ.संजय रोडगे अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.  प्रारंभी  प्रिन्स इंग्लिश स्कूल व जुनियर कॉलेज, प्राॅस्पेरस पब्लिक स्कूल व ज्ञानतीर्थ विद्यालय या शाळांचे अहवाल वाचन झाले. सूत्रसंचालन संजय ठाकर यांनी केले. डिगांबर ठाकरे यांनी आभार मानले.

आज पालकांची अवस्था चिंताजनक झाली आहे. कोणत्या प्रकारचे शिक्षण द्यावे, याबद्दल त्यांच्यात संभ्रम आहे. आठवीपर्यंत पालकांचे लक्ष कमी झाले आहे.पालकांनी पाल्याच्या प्रगतीची विचारणा वेळोवेळी शाळेकडे करायला हवी. विद्यार्थ्याबाबत जागरूकता ठेवावी. विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवावे. मोबाईल आपल्या पाल्याच्या आयुष्याशी खेळतोय, पाल्य अभ्यासापासून दूर जातोय, याची जाणीव हवी, असा सल्ला महेश पाटील यांनी या वेळी दिला.


चिंतेचे ढग : शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा; महिनाभरात ३८ टक्केच बरसला

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!