Jalna-Nanded Highway :  परभणी जिल्ह्यातील शेकडो शेतकरी मुंबईकडे रवाना; २६ जुलैपासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन 

Jalna-Nanded Highway :  परभणी जिल्ह्यातील शेकडो शेतकरी मुंबईकडे रवाना; २६ जुलैपासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन 

परभणी, नांदेड, जालना जिल्ह्यातील सहभाग; समृद्धी महामार्गाचा पाच पट मोबदला देण्याची मागणी 

परभणी : स्व.बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला जोडणार्‍या ‘जालना-परभणी-नांदेड महामार्गा’साठी संपादित करण्यात येत असलेल्या जमिनीसाठी, गुणांक दोन वापरून पाच पट मोबदला द्यावा, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी परभणी, नांदेड, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर बुधवारपासून (२६ जुलै) जोरदार धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी मंगळवारी, २५ जुलै रोजी सायंकाळी जालना, नांदेडसह परभणी जिल्ह्यातील ८७ गावखेड्यातील शेकडो शेतकरी रेल्वेने, तसेच खासगी वाहनाने मुंबईकडे रवाना झाले आहेत.

जालना-परभणी-नांदेड द्रुतगती महामार्ग शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी आंदोलन करण्यात येणार आहे. संघर्ष समितीचे रामेश्वर गाडेकर (रायपूर ता.सेलू) यांनी ही माहिती दिली. सेलू तालुक्यातून जाणाऱ्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गास जोडणाऱ्या जालना ते नांदेड द्रुतगती मार्गाचा भूसंपादन मोबदला बाजारभावाने मिळावा, यासाठी सेलू तालुक्यातील संबंधित शेतकऱ्यांची मागणी थेट विधानसभेच्या पायर्‍यापर्यंत पोहोचली आहे, तर शासनाने देऊ केलेल्या मोबदल्यावर आक्षेपांचा अक्षरशः पाऊस कोसळल्याचे चित्र मोबदल्यासंदर्भात सेलूच्या उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी कार्यालयात आक्षेप दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, १८ जुलै रोजी दिसून आले. यामध्ये ७१५ जणांनी आक्षेप अर्ज दाखल झाले आहेत. यावरूनच शेतकऱ्यांचा विरोध तीव्र असल्याचे दिसून येत आहे. जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गासाठी एकूण ३१० हेक्टर पैकी सर्वाधिक सेलू तालुक्यातील २४२ हेक्टर शेतजमीनचे भूसंपादन होत आहे. यामध्ये जिवाजी जवळा, चिकलठाणा बुद्रुक, चिकलठाणा खुर्द, रायपूर, वालूर, गुळखंड, हातनूर, हट्टा व तांदुळवाडी या नऊ गाव शिवारातील ५१५ खातेदार शेतकऱ्यांच्या जमीनीचा समावेश आहे, तर जिंतूर तालुक्यातील मारवाडी, कुंभारी, कौसडी व पिंपळगाव गायके परिसरातील १५८ खातेदार शेतकऱ्यांची ६८ हेक्टर जमीन संपादन होत आहे.

संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीची पाण्याचे स्तोत्र, सातबारा उतारा नोंद, स्थळ पाहणी याद्वारे बागायती, हंगामी बागायती, कोरडवाहू या प्रमाणे वर्गवारी करावी, फळबागांचे योग्य मुल्यांकन करण्यात यावे, संयुक्त मोजणी करून परिशिष्ट १६ तयार केले ते गृहित धरुन मूल्यांकन करण्यात यावे, संपूर्ण भूसंपादनाची प्रक्रिया २०१३ च्या कायद्याप्रमाणे राबवावी. यासह समृद्धी महामार्गमधील विविध मागण्या संदर्भात परभणी, नांदेड, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे २६ जुलै २०२३, बुधवार रोजी हजारो शेतकरी बांधवांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. रामेश्वर गाडेकर (सेलू) कॉम्रेड राजन क्षीरसागर (परभणी), संदेश देसाई (पूर्णा), गोविंद घाटोळ ( पूर्णा) विठ्ठल धस (परभणी), शिवाजी चोपडे (परभणी), दासराव हंबर्डे (नांदेड), अशोक रन्हेर (परभणी), कालिदास निर्वळ (मंठा), रमेश माने (सेलू), हरिश हंबर्डे (नांदेड ), विजय खरात (जवळा), प्रशांत नाईक (चिकलठाणा), परमेश्वर उबाळे (वाटुर), खाजाभाई काजी ( कुंभकर्ण टाकळी), कैलास जवंजाळ (परभणी) आदींच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी होणार आहेत, असे रामेश्वर गाडेकर यांनी सांगितले.

जालना-परभणी-नांदेड महामार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीची पाण्याचे स्तोत्र, सातबारा उतारा नोंद, स्थळ पाहणी याद्वारे बागायती, हंगामी बागायती, कोरडवाहू या प्रमाणे वर्गवारी करावी, फळबागांचे योग्य मुल्यांकन करण्यात यावे, संयुक्त मोजणी करून परिशिष्ट १६ तयार केले ते गृहित धरुन मूल्यांकन करण्यात यावे, संपूर्ण भूसंपादनाची प्रक्रिया २०१३ च्या कायद्याप्रमाणे राबवावी, यासह समृद्धी महामार्गमधील विविध मागण्या संदर्भात मुंबईत २६ जुलैपासून आंदोलन होत आहे.


Dr.Suraj Yengde : बहुजनांनी सत्ताधारी बनण्यासाठी प्रयत्न करावे : डॉ.सूरज एंगडे

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!