मातंग समाजाने संघटीत व्हावे : चंद्रशेखर बावनकुळे
परभणीत मातंग समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन उत्साहात
परभणी : मातंग समाजाचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान राहिलेले आहे. मागासवर्गीयात क्रमांकावर दोन वर समाज आहे मात्र, विखुरलेल्या मातंग समाजाला आजही न्यायासाठी झगडावे लागत आहे. त्यासाठी मातंग समाजाला शिक्षित, जागृत होऊन संघटित होण्याची गरज आहे. शिक्षित समाजच क्रांती करु शकतो, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने आयोजित मातंग समाजाचे ११ वे राज्यस्तरीय अधिवेशन शनिवारी,२९ जूलै रोजी व्यंकटेश मंगल कार्यालयात उत्साहात पार पडले. उद्घाटनप्रसंगी बावनकुळे बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजप नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर होते. प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, विक्रम पाटील, आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड, संयोजक तथा महामंत्री राधाजी शेळके, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, राजेश देशमुख, आनंद भरोसे, माजी आमदार रामराव वडकुते, गजाननराव घुगे, अॅड.शिवाजीराव जाधव, विठ्ठलराव रबदडे, अॅड.व्यंकटराव तांदळे, विजयराव वरपूडकर, प्रमोद वाकोडकर आदींसह मान्यवर उपस्थित होते.
श्री.बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्रातील नवे सरकार धडाडीने काम करीत आहे. मातंग समाजाच्या विकासासाठी आणि सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबध्द आहे. परभणीत क्रांतीवीर लहुजी साळवे यांचा पुतळा उभारण्यासंदर्भात झालेल्या मागणीबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, तुम्ही परभणी मनपावर महायुतीची सत्ता आणा, त्यानंतर पहिल्याच महिन्यात ही मागणी पूर्ण करू. प्रास्ताविकातून राधाजी शेळके यांनी समाजाच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. तसेच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे १५ प्रमुख मागण्या सादर केल्या. या अधिवेशनात मातंग व बहुजन समाजाच्या अनेक प्रश्नांवर विचारमंथन करण्यात आले. अधिवेशनाला महिला व पुरूष समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवकांनो, जीवन कौशल्येसुद्धा आत्मसात करा : अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे
जालना-नांदेड समृद्धी महामार्ग : मावेजासाठी शेतकऱ्यांचा ‘टाहो’
शिल्लक राहिलेल्यांना सांभाळा : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंनी सल्ला