हुतात्म्यांच्या बलिदानातून हैदराबाद मुक्तिसंग्राम यशस्वी : ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव

हुतात्म्यांच्या बलिदानातून हैदराबाद मुक्तिसंग्राम यशस्वी : ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव

परभणीतील श्री शिवाजी महाविद्यालयात हैदराबाद मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवानिमित्त व्याख्यान

परभणी : निजामाच्या जुलमी राजवटीच्या विरोधात स्टेट काँग्रेसने उभा केलेल्या लढ्याने हैदराबाद मुक्तीसंग्राम चळवळीस बळ मिळाले. या लढ्यात मराठवड्याचेही महत्वाचे योगदान राहिले आहे. देशातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या हैद्राबाद संस्थांनच्या विरोधात उभारलेला मुक्तीसंग्रामाचा लढा हा मराठवाड्यातील हुतात्म्यांच्या बलिदानातून हैदराबाद मुक्तिसंग्राम यशस्वी झाल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव यांनी व्यक्त केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि श्री शिवाजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार (२८ ऑगस्ट) रोजी हैदराबाद मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.अशोक सोनी, उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे, विद्यार्थी कल्याण मंडळाच्या सदस्या डॉ. संगीता आवचार आदी उपस्थित होते.
‘हैदराबाद मुक्तीसंग्राम समजून घेताना’ या विषयावर बोलताना निशिकांत भालेराव पुढे म्हणाले, मीर उस्मानअली हा निजामाचा शेवटचा निजाम होता. तो हैद्राबाद संस्थानला स्वतंत्र देश मानत असे. या संस्थानात रयतवारी, जहागीरदारी अशा पद्धती सुरू करून ८७ टक्के हिंदू असलेल्या प्रदेशात सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच सामाजिक दहशत निर्माण केली होती. त्याचबरोबर ब्रिटिशांच्या पंचसूत्रीचा वापर करीत बळाच्या आधारावर सत्ता करीत असे. त्याच्या आदेशानेच भारत स्वतंत्र झाला तरीही घरावर कोणीही तिरंगा झेंडा लावू शकत नसे, अशावेळी मराठवाड्यातील स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे, नागनाथ परांजपे यांच्यासारख्या थोर स्वातंत्र्यसेनानीच्या बळावर निजामाच्या विरोधात लढा उभा राहिला. यांनी तीस ते चाळीस हजार सैनिकांची फौज तयार केली. झेंडा आंदोलन, जंगल आंदोलन, रेल्वे तोडफोड, बॉम्बस्फोट, पोलीस स्टेशन उध्वस्त इत्यादी घटना घडवून आणल्या असेही ते म्हणाले. मराठवाड्यातील सेनानींच्या योगदानांचा विशेष उल्लेख करीत ते म्हणाले, या संग्रामात मराठवाड्यातील एकूण १०२ आंदोलनकर्ते हुतात्मे झाले.त्यात औरंगाबादचे १०, धाराशिवचे ११, बीडचे २१, नांदेडचे ३७ आणि परभणीचे ३० त्यात जिल्ह्यातील हुतात्मा बहिर्जी, राजेश्वर वाकोडकर, शिंदे, शकुंतला जोशी मोहनलाल मूर्क्या हुतात्म्यांना आहुती मिळाली. देश स्वतंत्र झाल्यास नांदेडमध्ये बोधनकर यांनी सर्वप्रथम आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावला, तर परांजपे बंधूनी निजामाची बँक लुटून केंद्र सरकारला ३८ लाख रुपयांची मदत दिली. शेवटी गोविंदभाई श्रॉफ आणि स्वामी रामानंद तीर्थ यांनी १० ऑगस्ट १९४८ रोजी मद्रासहून निजामाला शेवटचा संदेश पाठवला कि आम्ही जबाबदार राज्य सांभाळण्यासाठी सक्षम आहोत.तदनंतर केंद्रशासनाने ऑपरेशन पोलोच्या माध्यमातून निजाम राजवटीवर सशस्त्र हल्ला चढवला आणि हैदराबाद संस्थान स्वतंत्र झाले.ह्या सगळ्या घडामोडी सांगत असताना उपस्थित मंडळी मंत्रमुग्ध झाली होती. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.जाधव म्हणाले, मुक्तीसंग्रामात बलिदान दिलेल्या सेनानींचे बलिदान वाया जाऊ नये म्हणून आजच्या तरुणांनी प्रेरणा घेऊन देशसेवेचे वृत्त जोपासले पाहिजे. इतिहास हा नेहमी प्रेरणादायी असतो त्यातून प्रेरणा घेऊन पुढे गेले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी अनुष्का हिवाळे हीने तयार केलेल्या भीतीपत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते केले. एम.ए. पदवी परीक्षेत विद्यापीठात प्रथम आलेली मयुरी शिंदे आणि द्वितीय आलेली पूजा घोंगडे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास डॉ.दत्ता शिंदे, बालासाहेब काळे, माणिक रासवे यांचीही उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ.रोहिदास नितोंडे यांनी, सूत्रसंचालन समन्वयक डॉ.प्रल्हाद भोपे यांनी तरआभार डॉ.राजू बडूरे यांनी मानले. कार्यक्रमास बहुसंख्येने प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

स्वातंत्रसेनानी अनंत भालेराव यांच्या स्मृतींना उजाळा

निशिकांत भालेराव हे अनंत भालेराव यांचे चिरंजीव. त्यांनी अनंत भालेराव यांच्या हैद्राबाद मुक्तीसंग्रामातील योगदान, पत्रकारिता आणि साहित्यिक योगदान रेखांकित करीत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. दैनिक मराठवाडा या दैनिकांत लिहिलेल्या प्रखर लेखांचा त्यांनी यावेळी उल्लेख केला.


सामान्यांच्या जीवनात परिवर्तन करणारे सरकार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!