हैदराबाद मुक्तिसंग्राम : हुकुमशाही विरूद्ध नागरी स्वातंत्र्यचा लढा : प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी; सेलूतील ग्रंथालयात कार्यक्रम
स्वामी रामानंदब तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयात ‘एक दिवस एक पुस्तक’ उपक्रम
सेलू : एक जबाबदार शासन व्यवस्था प्रस्थापित व्हावी. नागरी स्वातंत्र्य मिळावे. एक भाषा एक सुत्राप्रमाणे महाराष्ट्र निर्माण व्हावा. जनतेचे कल्याण करणारे राज्य निर्माण होण्यासाठी हुकुमशाही विरोधातील हा लढा होता, असे मत प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या वतीने आयोजित ‘ एक दिवस एक पुस्तक ‘ या उपक्रमांतर्गत अनंतराव भालेराव यांच्या ‘ हैदराबाद मुक्ती संग्राम आणि मराठवाडा ‘ या पुस्तकावर शनिवारी ९ सप्टेंबर रोजी हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्राचार्य कुलकर्णी बोलत होते. अध्यक्षस्थानी बाबासाहेब चारठाणकर होते. नारायण इक्कर यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी म्हणाले की, ‘ हैदराबाद मुक्ती संग्रामात मराठवाड्यातील ग्रंथालय, व्यायामशाळा आणि शैक्षणिक संस्था यांचे महत्वाचे योगदान आहे. भारतीय राष्ट्रीय एकात्मतेसाठी, देश एकसंघ होण्यासाठी लढला गेलेला हैदराबाद मुक्ती संग्राम हा जगाच्या इतिहासात सुवर्णपानाने लिहावा असा लढा आहे. प्रास्ताविक शरद ठाकर यांनी केले. सूत्रसंचालन विजय ढाकणे यांनी केले. तर आभार डॉ.गंगाधर गळगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महादेव आगजाळ, विलास शिंदे, पंडित जगाडे, माधव गव्हाणे, डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी परिश्रम घेतले. मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, संजय विटेकर, डॉ.अशोक पाठक, डॉ.श्रीनिवास कुलकर्णी यांच्या श्रोते उपस्थित होते.