लालबावटाचे सेलूत धरणे आंदोलन; दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
सेलू : येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर किसान सभा, लालबावटाच्या वतीने सोमवारी,१८ सप्टेंबररोजी परभणी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सेलू जिंतूर तालुक्यातील शेतकरी शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. केंद्र व राज्य सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. कॉम्रेड उद्धव पौळ,अंकुश बुधवंत, रामेश्वर पौळ यांनी मोदी सरकार तसेच शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारच्या शेतकरी कामगार विरोधी धोरणावर घणाघाती हल्ला चढवला. परभणी जिल्हा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, घोषित केलेला २५ टक्के अग्रीम विमा वाटप करावा, जिंतूर तालुक्यातील वनपट्टेधारकांना वन जमीन नावे करा, मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवा, सरकारी नोकर्यांच्या खाजगीकरणाचा शासन निर्णय रद्द करा आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. येत्या काळात दुष्काळ जाहीर न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. देण्यात आला आंदोलनात कॉम्रेड उद्धव पौळ, अंकुश बुधवंत, रामेश्वर पौळ, दत्तुसिंग ठाकूर, राजू दक्ष, विष्णू चव्हाण, नारायण पवार रोहिदास हातकडके, मदन पौळ, गजानन जवादे, शांतीराम पौळ मारोती कुईले, रामदास पौळ, बापुराव निंबाळकर, रमेश बोडखे संतोष निंबाळकर, हरी गायकवाड गजानन बोटे, बबन दुभळकर, लक्ष्मण निंबाळकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.