संकल्प करा : परभणी लोकसभेचा खासदार भाजपाचा असला पाहिजे
माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन, सेलूमध्ये लोकसभा कार्यकर्ता आढावा बैठक उत्साहात
गेल्या नऊ वर्षाच्या कार्यकाळामध्ये सर्वसामान्य प्रत्येक नागरिकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिताचे निर्णय घेतले. सर्वसामान्यांना प्रधानमंत्री घरकुल, अंत्योदय योजना शेतकरी सन्मान योजना, आरोग्य संबंधीच्या विविध योजना अशा अनेक जनतेच्या हिताच्या योजना राबविल्या आहेत. त्या योजनांची माहिती बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख यांनी प्रत्येक घरी जाऊन सांगितली पाहिजे, असे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यावेळी म्हणाले.
सेलू : सेलूमध्ये गुरूवारी, १२ ऑक्टोबररोजी भाजपाचा लोकसभा कार्यकर्ता आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर म्हणाले की, परभणी जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभा या भाजपच्या निवडून आल्या पाहिजेत असा कार्यकर्त्यांनी संकल्प करावा.
सेलू येथील साई मंगल कार्यालय येथे सकाळी साडेअकरा वाजता लोकसभा आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, डॉ.संजय रोडगे, सुरेश भुमरे, अर्जुन बोरुळ, भाजपा तालुका अध्यक्ष ॲड. दत्तराव कदम, उद्योजक ॲड.संजय लोया, सुंदर गाडेकर, अजय डासाळकर, अनिल पवार, महिला अध्यक्षा वनिता चाफेकर, अशोक खताळ, विलास बाबर, भागवत दळवे, गणेश नाईकवाडे, विठ्ठलराव ताठे, भाऊ सोनवणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना बोर्डीकर म्हणाले की, गेल्या नऊ वर्षाच्या कार्यकाळामध्ये सर्वसामान्य प्रत्येक नागरिकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिताचे निर्णय घेतले. सर्वसामान्यांना प्रधानमंत्री घरकुल, अंत्योदय योजना शेतकरी सन्मान योजना, आरोग्य संबंधीच्या विविध योजना अशा अनेक जनतेच्या हिताच्या योजना राबविल्या आहेत. त्या योजनांची माहिती बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख यांनी प्रत्येक घरी जाऊन सांगितली पाहिजे. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांनी सांगितले, की सेलू जिंतूरमध्ये भाजपचा प्रभाव आहे. कार्यकर्त्यांनी पुन्हा जोमाने कामाला लागून जिल्ह्यात लोकसभेचा खासदार निवडून आणण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. जिल्हाभरात कार्यकर्ता आढावा बैठकीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भागवत दळवे, सुरेश भुमरे, विलास बाबर यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ.संजय रोडगे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सत्तर वर्षाच्या काँग्रेस राजवटीत ३७० कलम रद्द करता आले नाही, परंतु ९ वर्षाच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कलम रद्द केले व देशाच्या हिताचे धाडसी निर्णय घेतले. या वेळी हिस्सी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच दीपक गोरे यांच्यासह सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत व इतर ग्रामपंचायत सदस्य यांनी भाजप जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे हस्ते भाजपामध्ये प्रवेश केला संतोष मुरकुटे, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी भाजप या पक्षाचे रुमाल गळ्यात घालून त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. प्रास्ताविक दत्तराव कदम यांनी केले. सूत्रसंचालन दत्ता तांबे, तर आभार अर्जुन बोरुळ यांनी मानले. बैठकीला सेलू तालुक्यातील बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आढावा बैठक यशस्वी करण्यासाठी ॲड.दतराव कदम, शंकरराव भोंडवे, पंजाबराव पौळ, कपिल फुलारी बाळासाहेब काजळे, गणेश सवणे, सुनील चव्हाण, राजू सोळंके, गोविंद शर्मा आदीसह भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
डॉ.संजय रोडगे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सत्तर वर्षाच्या काँग्रेस राजवटीत ३७० कलम रद्द करता आले नाही, परंतु ९ वर्षाच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कलम रद्द केले व देशाच्या हिताचे धाडसी निर्णय घेतले.
निम्न दुधना धरणातून रब्बीसाठी पाणी सोडा; सेलू् तालुका दबाव गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी