बेमूदत उपोषण : अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी सेलूत बेमुदत उपोषण
दबाव गटाच्या नेतृत्वाखाली 21 गावातील शेतकऱ्यांचे उपोषण , तीन वर्षांपासून नुकसान भरपाई नाही
सेलू, प्रतिनिधी : सन-२०२० मधील अतिवृष्टी काळातील वालूर महसूल मंडळातील २१ गावांना अतिवृष्टीचे अनुदान मिळावे या मागणीसाठी सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने रविवारीपासून ( एक जानेवारी ) बेमुदत उपोषण सूरू करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणीचे निवेदन पाठविण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, ऑक्टोबर २०२० मध्ये तालुक्यातील वालुर महसूल मंडळातील २१ गावांत अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.जिल्हयात सर्वत्र अतिवृष्टी झालेली असताना, केवळ सेलू तालुक्यातील वालूर महसूल मंडळातील २१ गावांना या महसूल मंडळात अतिवृष्टी झाली नाही, असा अत्यंत चुकीचा अहवाल तत्कालीन तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांनी दिल्याने या २१ गावांना त्यावेळी २०२० मध्ये अतिवृष्टी होऊन ही वगळण्यात आले. त्यामुळे या महसूल मंडळातील शेतकर्यांवर नाहकअन्याय झाला. शेतकर्यांचे ताटात माती कालविण्याचे काम तत्कालीन तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांनी केले,असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
उपविभागीय अधिकारी, सेलू यांच्या कार्यालयासमोर दोन-तीन वेळा असंख्य शेतकर्यांनी लाक्षणिक उपोषण केले. लोकशाही मार्गाने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तत्कालीन विरोधीपक्ष नेते व आताचे मंत्री प्रविण दरेकर, विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेट घेऊन असंख्य शेतकर्यांनी निवेदन दिले.कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना प्रत्यक्ष भेटून ही या संदर्भात निवेदन दिलेले आहे. मात्र कसल्याही प्रकारची सकारात्मक कार्यवाही झालेली नाही. शासन व प्रशासन या शेतकर्यांच्या न्याय मागणी बाबत उदासीन आहे. केवळ घोषणाबाजी चालू आहे. अतिवृष्टी व याच काळात लोअर दुधना धरणातून नदी पात्रात प्रचंड प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. याचा फटका पिकांना बसला. अतिवृष्टी काळातील वालूर महसूल मंडळातील २१ गावांना अतिवृष्टी अनुदान देण्यात यावे, अन्यथा एक जानेवारी पासून बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला होता त्या प्रमाने रविवार १ जाने रोजी सकाळी दबाव गट व वालूर मंडळातील शेतकरी मोठ्या संस्खेने उपोषणास बसले आहेत.
निवेदनावर ॲड.श्रीकांत वाईकर,राजेद्रं लहाने, गणेश मूंढे, इसाक पटेल,ओमप्रकाश चव्हाळ,ॲड.देवराव दळवे, रामचंद्र कांबळे, लक्ष्मण प्रधान, योगेश सुर्यवंशी, रौफ भाई, मुकुंद टेकाळे, दिलीप मगर, रामचंद्र आधान, दत्तराव कांगणे, सतिश काकडे, अंबादास काकडे, अजित मंडलिक केशव डोईफोडे, दत्ता गायके, गुलाब पौळ, नारायण पवार, भुजबळ, उध्दव सोळंके, उत्तम गवारे ,आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
वालूर मंडळातील २१ गावातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी दबाव गटाचे ॲड.श्रीकांत वाईकर व पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
हेहा वाचा : विनोद बोराडे : सिर्फ नाम ही काफी है…
हेही वाचा : शैक्षणिक सहल : विवेकानंद शाळेची क्षेत्रत्रेट; येलदरी, नेमगिरी परिसराला भेट
हेही वाचा : सुरभी महोत्सव : तरूणाईच्या जल्लोषात प्रेक्षक धुंद; सांस्कृतिक उत्सव ठरला लक्षवेधी