आंदोलन : पत्रकार शशिकांत वारीशे हत्येचा परभणी, सेलूत निषेध; आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी

आंदोलन : पत्रकार शशिकांत वारीशे हत्येचा परभणी, सेलूत निषेध; आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी

परभणीत पत्रकारांची जोरदार निदर्शने, सेलूत निवेदन

आंदोलन : पत्रकार शशिकांत वारीशे हत्येचा परभणी, सेलूत निषेध; आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी

परभणी : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्यावर भ्याड हल्ला करून त्यांची हत्त्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी, दहा फेब्रुवारीी रोजी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने परभणीत पत्रकारांनी जोरदार निदेर्शन करीत आंदोलन केले. सेलू येथील पत्रकरांनी उपविभागीय अधिकारी अरूणा संगेवार यांना निवेदन दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी अकरा वाजता शहरातील पत्रकांरानी काळ्या फिती लावून जोरदार निदर्शने केली. जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी , पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटूंबींयाना तात्काळ आर्थिक मदत द्यावी त्याच बरोबर पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
महाराष्ट्र सभ्य आणि सुसस्कृत भूमिका घेवून पत्रकारिता करणार्‍या पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जातो. पत्रकारावर हल्ले करुन किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतांना दिसतो. पत्रकार संरक्षण कायदा आहे. मात्र; या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जाते आहे. सातत्याने अशा घटना वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. महानगर टाईम्सचे राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे हे सोमवारी सोमवारी कोदवली येथून दुचाकीने जात असतांना भरधाव वेगात येणार्‍या महेंद्रा थार गाडीने त्यांना धडक दिली. यात वारिसे यांचा मृत्यू झाला. हा अपघात नसून घातपात आहे हे उघडच आहे. शशिकांत यांने ज्याच्या विरोधात बातमी प्रसिध्द केली ते कारचालक पंढरीनाथ आंबेरकर हे हेाते. सकाळी विरोधात बातमी लागते अणि त्याच व्यक्तीची कार वारिसे यांच्या गाडीला धडक देते हा योगायोग नसून कट रचून केलेला खूनच असल्याचे निवेदनात म्हटले आहे.या प्रकरणातील आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, या खटल्याची सुनावणी फास्टट्रक कोर्टात करण्यात यावी आणि पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
ज्येष्ठ पत्रकार डॉ. आसाराम लोमटे, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, विठ्ठलराव वडकुते, प्रभू दिपके, राजकुमार हट्टेकर, रमाकांत कुलकर्णी, ड़ॉ.धनाजी चव्हाण, शिवशंकर सोनुने, मोईन खान, लक्ष्मण मानोलीकर, सुधाकर श्रीखंडे, संजय बगाटे, राजेश गोरे, रवि मानवतरकर, सय्यद जमिल, बाळासाहेब घिके, धनंजय नांदापूरकर, राहूल धबाले, उत्तम बोरसुरीकर, दिलीप बोरुळ, दत्रात्रय कराळे, किरण स्वामी, बाळासाहेब शिंदे, सुनिल सुतारे, संजय घनसावंत, शंकर झाटे, लक्ष्मीकांत बनसोडे, सय्यद खिजर, रियाज कुरेशी, मोहन धारासुरकर आदींसह पत्रकारांच्या निवेदनावर सह्या आहेत.

सेलूत पत्रकारांचे निवेदन 

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांची अज्ञात समाजकंटकांनी निर्घृण हत्या केली; तसेच गेल्या आठ दिवसात केज, मुखेड व धुळे येथे पत्रकारावर हल्ले करून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. या घटनेचा सेलू तालुका पत्रकार संघाकडून तीव्र निषेध नोंदवण्यात आला. पत्रकारांना सुरक्षा कवच मिळावे व दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायदा कलमांतर्गत गुन्हे दाखल करून पत्रकारांना संरक्षण द्यावे, अशी मागणी यावेळी उपविभागीय अधिकारी अरूणा संगेवार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. या वेळी ज्येष्ठ पत्रकार डी.व्ही.मुळे, लक्ष्मण बागल, कांचन कोऱडे, शेख मोहसीन आदींसह पत्रकार उपस्थित होते.


अंगणवाडी : विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

Scientific : जादूच्या प्रयोगात मुले झाली दंग; केमापूरच्या शाळेचा उपक्रम

Pico Satellite : प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या व्हिजन खाडेची प्रक्षेपणसाठी निवड; पूर्वेश गुप्ताचा सहभाग

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!