स्नेहसंमेलन : सेलूतील विवेकानंद शाळेत बक्षीस वितरण; सांस्कृतिक महोत्सवाने जिंकली मने

स्नेहसंमेलन : सेलूतील विवेकानंद शाळेत बक्षीस वितरण; सांस्कृतिक महोत्सवाने जिंकली मने

विविध कलाविष्काराचे सादरीकरण, पालक, विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती

सेलू : येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित सांस्कृतिक महोत्सवात सादर झालेल्या विविध कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकली.

बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य, प्रशासकीय अधिकारी प्रा.चंद्रकांतजी मुळे, शालेय समिती अध्यक्ष करुणा कुलकर्णी, स्थानिक कार्यवाह उपेंद्र बेल्लूरकर, नवलकिशोरजी काबरा व सर्वेश काबरा, मुख्याध्यापक शंकर शितोळे यांची उपस्थिती होती.

इयत्ता बालवाडी ते ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे प्रशस्तीपत्र देऊन कौतुक करण्यात आले. इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत सादर केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक शंकर शितोळे यांनी केले. ‘ शिकू आनंदे ‘ मधून संस्कार केंद्राची रूपरेषा उद्दिष्टे उपेंद्र बेलूरकर यांनी सांगितली. प्रा.चंद्रकांतजी मुळे यांनी विद्यार्थ्यांचा सहभाग हा शाळेच्या उन्नतीसाठी किती महत्त्वाचा असतो उपक्रमातील सहभाग शाळेच्या प्रगतीसाठी अतिशय पोषक ठरतो, असे नमूद केले. डॉ.हेमंत वैद्य यांनी विवेकानंद संस्कार केंद्राचे विद्यार्थी हे प्रत्येक क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत व शाळेची प्रतिमा उंचावत आहेत. याविषयी आनंद व्यक्त केला; तसेच संस्कारक्षम पिढी निर्माण होण्यासाठी हे संस्कार केंद्र सदैव कार्यरत आहे, असे प्रतिपादन केले. सूत्रसंचालन सूत्रसंचालन विनोद मंडलिक, गजानन साळवे यांनी केले. कार्यक्रमासाठी अनिल कौसडीकर, रागिणी जकाते, विजय चौधरी, शंकर राऊत, अभिषेक राजुरकर, काशिनाथ पांचाळ,शारदा पुरी, .स्वप्नाली देवडे, सोनाली जोशी, आदिती अंबेकर, रसिका बावणे, विशाल सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

sakashnews.com

विवेकानंद प्राथमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी भारताच्या प्रत्येक राज्यातील विविध परंपरा, पोशाख, संस्कृती ही मध्यवर्ती कल्पना घेऊन देशातील राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे नृत्य, नाटकांचे सादरीकरण करण्यात आले. शहीद भगतसिंग यांच्यावर आधारित नाटकाने सर्वांचे लक्ष वेधून घेऊन उपस्थितांची मने जिंकली. तर देशभक्तीपर गीतांवर आधारित नृत्यविष्काराने अंगावर शहारे उभे राहिले.

Politics : फडणवीसांनी खरं बोलायला शिकावं : खासदार सुप्रिया सुळे

गुणवंतांचा गौरव : सेलूतील न्यू हायस्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!