उद्बोधन : प्रगत शिक्षणासाठी शिक्षकांनी सज्ज व्हावे; जेष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ.प्राची साठे यांचे आवाहन
‘स्व-जाणिवा विकसित करूया’ उद्बोधन शिबिर : शिक्षण विभाग व जिल्हा परिषद परभणी यांचा उपक्रम
परभणी : आजच्या विद्यार्थ्यांचा मेंदू अत्यंत प्रगत आहे. कुठलेही शिक्षण नसलेले मूल मोबाईलसारखे तंत्र सहजपणे हाताळते. त्यामुळे स्व-जाणीवा जागृत करत शिक्षकांनी सकारात्मकतेने अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करून एकविसाव्या शतकातील प्रगत शिक्षणासाठी सदैव सज्ज असले पाहिजे, असे मत मत जेष्ठ शिक्षण तज्ज्ञ तथा महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम निर्मिती मंडळाच्या समन्वयक डॉ.प्राची रवींद्र साठे यांनी व्यक्त केले.
शिक्षण विभाग व जिल्हा परिषद परभणी यांच्या वतीने शिक्षकांसाठी “स्व-जाणिवा विकसित करूया ” या विषयावरील उद्बोधन शिबिराचे आयोजन बुधवारी, २१ जून रोजी परभणी येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना प्राची साठे बोलत होत्या. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड, प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, उपशिक्षणाधिकारी श्रीपाद देशपांडे, शौकत पठाण, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अनिल मुरकुटे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
प्राची साठे पुढे म्हणाल्या, की शिक्षक जसे आपले कुटुंब जबाबदारीने पुढे नेतो, तसे आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या बाबतीतही शिक्षकाने दक्ष असले पाहिजे. यासाठी शिक्षकांना स्वतःमध्ये मोठा बदल घडवून आणून स्व-जाणीवा जागृत करणे गरजेचे आहे. शिक्षकांनी सतत प्रवाहात राहिले पाहिजे. उत्तम ज्ञान विद्यार्थ्यांना द्यायचे असेल तर आधी शिक्षकांनी नवनवीन ज्ञान संपादन करणे गरजेचे आहे. नाही तर विद्यार्थीच आपल्याला बाजूला टाकू शकतात. म्हणून शिक्षकाने सतत सकारात्मक असले पाहिजे. विद्यार्थी हे चंचल असतात. प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो म्हणून शिक्षकाला सर्व विद्यार्थ्यांना समजून घेण्याचे कौशल्यसुद्धा जमले पाहिजे.
प्रास्ताविक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप शृंगारपुतळे यांनी केले. जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षण प्रेमी नागरिकांची उपस्थिती होती.
शिक्षण तज्ज्ञ प्राची साठे म्हणाल्या, की शिक्षक जसे आपले कुटुंब जबाबदारीने पुढे नेतो, तसे आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या बाबतीतही शिक्षकाने दक्ष असले पाहिजे. सतत प्रवाहात राहिले पाहिजे. उत्तम ज्ञान विद्यार्थ्यांना द्यायचे असेल, तर आधी शिक्षकांनी नवनवीन ज्ञान संपादन करणे गरजेचे आहे. नाही तर विद्यार्थीच आपल्याला बाजूला टाकू शकतात. म्हणून शिक्षकाने सतत सकारात्मक असले पाहिजे. विद्यार्थी हे चंचल असतात. प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो म्हणून शिक्षकाला सर्व विद्यार्थ्यांना समजून घेण्याचे कौशल्यसुद्धा जमले पाहिजे.
योगाभ्यास शिबिराला सेलूत उत्स्फूर्त प्रतिसाद;पतंजली योग समिती व क्रांती फाऊंडेशनचा पुढाकार
प्रेरणादायी : सेलू तालुक्यातील चारशे गुणवंतांचा सन्मान; दीपस्तंभ प्रतिष्ठानचा उपक्रम