वीरशैवांची मागणी : स्मशानभूमीतील समस्या तातडीने सोडवा

वीरशैवांची मागणी : स्मशानभूमीतील समस्या तातडीने सोडवा

शिवा संघटना : सेलूच्या मुख्याधिकार्‍यांना निवेदन, बेमुदत उपोषणाचा इशारा

सेलू जि.परभणी : वीरशैव लिंगायत स्मशानभूमीतील समस्या तातडीने सोडवा अशी मागणी शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी देविदास जाधव यांच्याकडे केली आहे.
२२ डिसेंबर रोजी हे निवेदन देण्यात आले. वीरशैवांची स्मशानभूमी सर्वे नंबर ३३ मध्ये आहे. दरवर्षी अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी घुसते. अनावश्यक झाडे उगवतात. दलदल होते. प्रेताची विटंबना होते. याशिवाय अंत्यविधी करताना समस्येला सामोरे जावे लागते. पालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र कार्यवाही नाही. वाढलेले झाडे काढून जागा समपातळीत करावी, नाला पिंचींग, स्व.संभाप्पा सोनटक्के स्मरणार्थ नवीन पुलाजवळ कमान बांधावी, गेट करावे, वृक्षारोपण व्हावे. आदी मागण्या निवेदनात नमूद आहेत. आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. शिवा संघटनेचे तालुकाप्रमुख निजलिंगप्पा तरवडगे, जिल्हा उपप्रमुख शिवकुमार नावाडे, शहरप्रमुख विनोद भगत, बबनअप्पा झमकडे, सुनील नवघरे, शंकर राऊत, मनोहर चलवदे, गणेश केशरखाने, कैलास मिटकर, गणेश सूर्यवंशी सुजीत मिटकरी आदी उपस्थित होते.


SAKASHNEWS.COM


ग्रामपंचायतीत : तरुणाईचाच बोलाबाला; प्रतिष्ठेची बाजी अन् लाखोंचा चुराडा…

हेही वाचा : अनुदान द्या हो : वालूर मंडळातील २१ गावांना अतिवृष्टी नुकसानभरपाई नाही

हेही वाचा : धनलक्ष्मी : महिला नागरी पतसंस्थेचा शुभारंभ; 75 लाखांच्या ठेवी जमा

हेही वाचा : संगीत महोत्सव : सेलूतील रसिकांनी शनिवार, रविवार सांगितिक मेजवानी   

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!