निवडणूक विभागाची माहिती, मतदान प्रक्रिया शांततेत
सेलू जि.परभणी : सेलू तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतीसाठी रविवारी, १८ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सरासरी ७३.५७ टक्के मतदान झाले आहे. म्हाळसापुरात सर्वाधिक ८६.८०, तर त्या खालोखाल डिग्रस जहांगीर ८५.२९, शिंदे टाकळी ८३.५३ आणि माले टाकळीत ८१.४२ टक्के मतदान शांततेत झाले आहे, अशी माहिती सेलूतील निवडणूक विभागाने दिली आहे.
रवळगाव ६४.९७, गुगळी धामणगाव ७४.०२, डासाळा ६९.३३, राधे धामणगाव ६९.४१, बोरकिन्ही – नरसापूर ७१.९५, कुपटा ६४.८५, तर राव्हा येथील मतदान केंद्रावर ७८.६१ टक्के मतदान झाले आहे. निवडणुकीसाठीच्या 36 मतदान केंद्रावर एकूण १८६४२ मतदारांपैकी पुरुष ६८५७, तर महिला ६८५८ अशा एकूण १३७१५ मतदारांनी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत टक्केवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सकाळपासून उत्साह
सकाळी साडे सात वाजता मतदान प्रक्रिया उत्साहात सुरू झाली. दुपारी दीड वाजेपर्यंत सरासरी 56.67 टक्के मतदान झाले होते. प्रामुख्याने रवळगाव, कुपटा, डासाळा, गुगळी धामणगाव आदी मोठ्या ग्रामपंचायतीसह डिग्रस जहांगीर, शिंदे टाकळी, माले टाकळी, राधे धामणगाव, राव्हा, बोरकिन्ही-नरसापूर, म्हाळसापूर ग्रामपंचायतीतही चुरस आहे. तरूणांच्या सक्रिय सहभागामुळे काही ठिकाणी प्रतिष्ठेच्या लढती आहेत. या सर्वांचे भवितव्य सायंकाळी साडेपाच वाजता यंत्रबंद होईल. मंगळवारी मतमोजणीनंतर काही तासांत निकाल हाती येतील, अशी चिन्हे आहेत.
हेही वाचा : आंतरभारती राष्ट्रीय निबंध स्पर्धा : कोकंडाकर, डॉ.सागर, अंतरा कुलकर्णी विजेते
हेही वाचा : Brahmakumaris : मनाची शक्ती, एकाग्रता वाढवा : पल्लवी चव्हाण
हेही वाचा : तीव्र निषेध : बिलावल भुत्तोंच्या पुतळ्याचे सेलूत दहन, भाजपाचे आंदोलन
हेही वाचा : थोर संतांवर विकृत टीका : सुषमा अंधारे यांच्या प्रतिमेला सेलूतील वारकऱ्यांनी मारले जोडे